शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत ...

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल १३५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील रुग्णांचे अधिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरु झाली. या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल १३५ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यूदराचा विचार केल्यास शहरी भागातील मृत्यूदर ३.०७ इतका असून, ग्रामीण भागातील मृत्यूदर ३.११ इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय रुग्ण

आटपाडी ३८५६

जत ३४६२

कडेगाव ४२४१

कवठेमहांकाळ ३०९७

खानापूर ४६४७

मिरज ५९८०

पलूस ३२११

शिराळा ३०२३

तासगाव ४५१३

वाळवा ७७२८

चौकट

तालुकानिहाय मृत्यू

आटपाडी ४७

जत ८३

कडेगाव ८४

कवठेमहांकाळ ११०

खानापूर १२३

मिरज २३३

पलूस १२४

शिराळा ७६

तासगाव १८६

वाळवा ३०३

चौकट

ऑक्सिजन व आयसीयु बेडस

तालुका ऑक्सिजन आयसीयु

आटपाडी ५० १४

जत १२५ २६

कवठेमहांकाळ ७५ १५

वाळवा ४०४ १२९

विटा १३२ ४७

शिराळा १४५ १२

पलूस १७५ १४

तासगाव १११ १८

कडेगाव ८५ ११

मिरज ५९६ ४१२

चौकट

पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक भटकंती

जत पूर्व भागातील आसंगी, सोनलगी या गावातील ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना माडग्याळ किंवा जतला यावे लागते. हे अंतर ३६ किलोमीटरचे आहे. तिथेही बेड मिळाला नाही तर अन्य तालुक्यांना किंवा सांगलीला १२३ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तीच परिस्थिती आटपाडी तालुक्यातील आहे. याठिकाणच्या झरे परिसरातील ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आटपाडीत ३४ किलोमीटरचे अंतर कापून जावे लागते. झरेपासून सांगलीचे अंतर ८५ किलोमीटर आहे. अशी धावाधाव रुग्णांना व नातेवाईकांना करावी लागते.

चौकट

मृत्यू

पहिल्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने जवळपास शंभरावर कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचा अंदाज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.