शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत ...

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल १३५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील रुग्णांचे अधिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरु झाली. या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल १३५ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यूदराचा विचार केल्यास शहरी भागातील मृत्यूदर ३.०७ इतका असून, ग्रामीण भागातील मृत्यूदर ३.११ इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय रुग्ण

आटपाडी ३८५६

जत ३४६२

कडेगाव ४२४१

कवठेमहांकाळ ३०९७

खानापूर ४६४७

मिरज ५९८०

पलूस ३२११

शिराळा ३०२३

तासगाव ४५१३

वाळवा ७७२८

चौकट

तालुकानिहाय मृत्यू

आटपाडी ४७

जत ८३

कडेगाव ८४

कवठेमहांकाळ ११०

खानापूर १२३

मिरज २३३

पलूस १२४

शिराळा ७६

तासगाव १८६

वाळवा ३०३

चौकट

ऑक्सिजन व आयसीयु बेडस

तालुका ऑक्सिजन आयसीयु

आटपाडी ५० १४

जत १२५ २६

कवठेमहांकाळ ७५ १५

वाळवा ४०४ १२९

विटा १३२ ४७

शिराळा १४५ १२

पलूस १७५ १४

तासगाव १११ १८

कडेगाव ८५ ११

मिरज ५९६ ४१२

चौकट

पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक भटकंती

जत पूर्व भागातील आसंगी, सोनलगी या गावातील ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना माडग्याळ किंवा जतला यावे लागते. हे अंतर ३६ किलोमीटरचे आहे. तिथेही बेड मिळाला नाही तर अन्य तालुक्यांना किंवा सांगलीला १२३ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तीच परिस्थिती आटपाडी तालुक्यातील आहे. याठिकाणच्या झरे परिसरातील ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आटपाडीत ३४ किलोमीटरचे अंतर कापून जावे लागते. झरेपासून सांगलीचे अंतर ८५ किलोमीटर आहे. अशी धावाधाव रुग्णांना व नातेवाईकांना करावी लागते.

चौकट

मृत्यू

पहिल्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने जवळपास शंभरावर कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचा अंदाज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.