शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत ...

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल १३५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील रुग्णांचे अधिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरु झाली. या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल १३५ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यूदराचा विचार केल्यास शहरी भागातील मृत्यूदर ३.०७ इतका असून, ग्रामीण भागातील मृत्यूदर ३.११ इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय रुग्ण

आटपाडी ३८५६

जत ३४६२

कडेगाव ४२४१

कवठेमहांकाळ ३०९७

खानापूर ४६४७

मिरज ५९८०

पलूस ३२११

शिराळा ३०२३

तासगाव ४५१३

वाळवा ७७२८

चौकट

तालुकानिहाय मृत्यू

आटपाडी ४७

जत ८३

कडेगाव ८४

कवठेमहांकाळ ११०

खानापूर १२३

मिरज २३३

पलूस १२४

शिराळा ७६

तासगाव १८६

वाळवा ३०३

चौकट

ऑक्सिजन व आयसीयु बेडस

तालुका ऑक्सिजन आयसीयु

आटपाडी ५० १४

जत १२५ २६

कवठेमहांकाळ ७५ १५

वाळवा ४०४ १२९

विटा १३२ ४७

शिराळा १४५ १२

पलूस १७५ १४

तासगाव १११ १८

कडेगाव ८५ ११

मिरज ५९६ ४१२

चौकट

पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक भटकंती

जत पूर्व भागातील आसंगी, सोनलगी या गावातील ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना माडग्याळ किंवा जतला यावे लागते. हे अंतर ३६ किलोमीटरचे आहे. तिथेही बेड मिळाला नाही तर अन्य तालुक्यांना किंवा सांगलीला १२३ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तीच परिस्थिती आटपाडी तालुक्यातील आहे. याठिकाणच्या झरे परिसरातील ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आटपाडीत ३४ किलोमीटरचे अंतर कापून जावे लागते. झरेपासून सांगलीचे अंतर ८५ किलोमीटर आहे. अशी धावाधाव रुग्णांना व नातेवाईकांना करावी लागते.

चौकट

मृत्यू

पहिल्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने जवळपास शंभरावर कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचा अंदाज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.