शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

इंधन दरवाढीने वाहतूकदारांचा खिसा रिकामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST

सांगली : व्यवसायातील मंदीमुळे आधीच चक्रव्यूहात सापडलेल्या मालवाहतूकदारांचे दररोजच्या इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढत असताना ...

सांगली : व्यवसायातील मंदीमुळे आधीच चक्रव्यूहात सापडलेल्या मालवाहतूकदारांचे दररोजच्या इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढत असताना भाडेवाढ मात्र झालेली नाही. त्यामुळे तोट्यात असलेला हा व्यवसाय आणखी खड्ड्यात जाऊ लागला आहे. वाहनांची चाके फिरल्यानंतर मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च पाहता वाहतूकदारांचा खिसा रिकामाच राहत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवसायच ठप्प होता. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यावसायिकांनी वाहने रस्त्यांवर आणली. त्यात वाहनधारकांना डिझेल दरवाढीचा झटका बसू लागला. नोव्हेंबरमध्ये ७५ रुपये दर होता, तो फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ८७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहा ते बारा रुपयांची वाढ झाली. त्यात फेब्रुवारी महिन्यात दररोज डिझेलचे दर बदलत आहेत. एका वाहनाला किलोमीटरला २५ रुपये इतका डिझेलचा खर्च येतो; तर चालकाचा पगार, देखभाल, टोल व इतर खर्चाचा त्यात समावेश नाही. हा केवळ डिझेलचा खर्च आहे. तर भाडे मात्र ३० ते ३५ रुपये इतके आहे. डिझेलव्यक्तिरिक्त होणारा खर्च त्यात धरला तर वाहन व्यवसाय तोट्यात असल्याचे वाहनचालकांचे मत आहे. त्यामुळे किलोमीटरला किमान ४० ते ४५ रुपये भाडे असावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे. पण हा वर्ग संघटित नसल्याने त्यावर कोणताच निर्णय होत नाही.

सध्या दिवसेदिवस डिझेलचे दर वाढू लागल्याने वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. विमा, बँकेतील कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मंदीमुळे आधीच ६० टक्के वाहने रस्त्यावर आहेत. डिझेल महागले तरी भाडेवाढ झालेली नाही. मालवाहतुकीची भाडेवाढ ही बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यांवर अवलंबून असते. मंदीमुळे मालाची मागणी कमी आहे. त्यामुळे भाडेवाढ केल्यास वाहनाची चाके कशी फिरणार, याची चिंता वाहनधारकांना लागली आहे.

चौकट

कोट

केंद्र शासनाच्या स्क्रॅप पाॅलिसीमुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण असतानाच डिझेल दरवाढीने उरलासुरला व्यवसायही धोक्यात आला आहे. शासनाकडून प्रवासी वाहतुकीला संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर मालवाहतुकीला मात्र कुठल्या सवलतीचा लाभ मिळत नाही. आर्थिक मंदी व शासनाच्या धोरणामुळे भविष्यात हा व्यवसायच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

- महेश पाटील, संचालक, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

चौकट

कोट

जिल्ह्यातून देशभरात मालाची वाहतूक केली जाते. वाहतूकदार वर्ग संघटित नसल्याने त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. सध्या डिझेलचे दर वाढले तरी फारशी भाडेवाढ झालेली नाही. केवळ सांगली ते जयगड पोर्टपर्यंतची भाडेवाढ झाली आहे. मुंबईसह इतर शहरांकडे होणारी वाहतुकीची भाडेवाढ नाही. त्यासाठी केंद्र शासनानेच किमान भाडे ठरवून देण्याची गरज आहे.

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन