शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

इंधन दरवाढीने वाहतूकदारांचा खिसा रिकामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST

सांगली : व्यवसायातील मंदीमुळे आधीच चक्रव्यूहात सापडलेल्या मालवाहतूकदारांचे दररोजच्या इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढत असताना ...

सांगली : व्यवसायातील मंदीमुळे आधीच चक्रव्यूहात सापडलेल्या मालवाहतूकदारांचे दररोजच्या इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढत असताना भाडेवाढ मात्र झालेली नाही. त्यामुळे तोट्यात असलेला हा व्यवसाय आणखी खड्ड्यात जाऊ लागला आहे. वाहनांची चाके फिरल्यानंतर मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च पाहता वाहतूकदारांचा खिसा रिकामाच राहत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवसायच ठप्प होता. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यावसायिकांनी वाहने रस्त्यांवर आणली. त्यात वाहनधारकांना डिझेल दरवाढीचा झटका बसू लागला. नोव्हेंबरमध्ये ७५ रुपये दर होता, तो फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ८७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहा ते बारा रुपयांची वाढ झाली. त्यात फेब्रुवारी महिन्यात दररोज डिझेलचे दर बदलत आहेत. एका वाहनाला किलोमीटरला २५ रुपये इतका डिझेलचा खर्च येतो; तर चालकाचा पगार, देखभाल, टोल व इतर खर्चाचा त्यात समावेश नाही. हा केवळ डिझेलचा खर्च आहे. तर भाडे मात्र ३० ते ३५ रुपये इतके आहे. डिझेलव्यक्तिरिक्त होणारा खर्च त्यात धरला तर वाहन व्यवसाय तोट्यात असल्याचे वाहनचालकांचे मत आहे. त्यामुळे किलोमीटरला किमान ४० ते ४५ रुपये भाडे असावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे. पण हा वर्ग संघटित नसल्याने त्यावर कोणताच निर्णय होत नाही.

सध्या दिवसेदिवस डिझेलचे दर वाढू लागल्याने वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. विमा, बँकेतील कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मंदीमुळे आधीच ६० टक्के वाहने रस्त्यावर आहेत. डिझेल महागले तरी भाडेवाढ झालेली नाही. मालवाहतुकीची भाडेवाढ ही बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यांवर अवलंबून असते. मंदीमुळे मालाची मागणी कमी आहे. त्यामुळे भाडेवाढ केल्यास वाहनाची चाके कशी फिरणार, याची चिंता वाहनधारकांना लागली आहे.

चौकट

कोट

केंद्र शासनाच्या स्क्रॅप पाॅलिसीमुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण असतानाच डिझेल दरवाढीने उरलासुरला व्यवसायही धोक्यात आला आहे. शासनाकडून प्रवासी वाहतुकीला संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर मालवाहतुकीला मात्र कुठल्या सवलतीचा लाभ मिळत नाही. आर्थिक मंदी व शासनाच्या धोरणामुळे भविष्यात हा व्यवसायच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

- महेश पाटील, संचालक, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

चौकट

कोट

जिल्ह्यातून देशभरात मालाची वाहतूक केली जाते. वाहतूकदार वर्ग संघटित नसल्याने त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. सध्या डिझेलचे दर वाढले तरी फारशी भाडेवाढ झालेली नाही. केवळ सांगली ते जयगड पोर्टपर्यंतची भाडेवाढ झाली आहे. मुंबईसह इतर शहरांकडे होणारी वाहतुकीची भाडेवाढ नाही. त्यासाठी केंद्र शासनानेच किमान भाडे ठरवून देण्याची गरज आहे.

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन