शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी उद्या घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना ...

सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना भरपाईपोटी एक रुपयाचीही मदत झालेली नाही. शासनाने तातडीने मदत द्यावी, यासाठी बुधवारी गणरायाला घंटानाद करून साकडे घातले जाणार असल्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी सोमवारी सांगितले.

सर्वपक्षीय कृती समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला माजी आ. नितीनराजे शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अश्रफ वांकर, राजकुमार राठोड, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, महेश पाटील, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, रेखा पाटील, राहुल पाटील, अविनाश जाधव, अभिमन्यू भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, सॅमसन तिवडे, आकाश तिवडे आदी उपस्थित होते.

साखळकर म्हणाले की, सांगली शहरासह जिल्ह्याला जुलै महिन्यात महापुराचा फटका बसला. लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पूरग्रस्त नागरिकांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली; पण आता दीड महिना लोटला तरी एक रुपयाचेही अनुदान जमा झालेले नाही. शासनाकडून रेशनवर धान्य, व्यापाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणाच झाली. शासनाला जाग आणण्यासाठी आणि सुबुद्धी द्यावी, यासाठी बुधवारी गणपती मंदिरासमोर घंटानाद करून गणेशाला साकडे घातले जाणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले.