शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहिती अधिकार हवा

By admin | Updated: December 13, 2014 00:17 IST

प्राचार्य साळुंखे : माहिती अधिकारावर मिरजेत चर्चासत्र सुरू

मिरज : देशाला भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माहितीचा अधिकार प्रभावीपणे राबविण्याची व माहिती अधिकाराचा गैरवापर रोखण्याची गरज असल्याचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगितले. मिरजेत डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे ‘माहिती अधिकार-भ्रष्टाचार रोखण्याचे साधन’ व पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘अपारंपरिक ऊर्जा व व्यावहारिक साधनांचा आर्थिक उपयोग’ या विषयावर आयोजित संयुक्त चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्याहस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. पाटील होते.साळुंखे म्हणाले की, आर्थिक चारित्र्य हा भ्रष्टाचाराला रोखणारा एक प्रभावी मार्ग आहे. माहिती अधिकारामुळे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करता येणे शक्य आहे. आपला देश तीनशे वर्षांच्या मोगलाईच्या, तर दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. मात्र देश भ्रष्टाचारमुक्त करणे सर्वांसमोरील आव्हान आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपल्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सात्त्विक व सकारात्मक विचारांचा ध्यास घेऊन शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडविली. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, वाढत्या औद्योगिक विकासामुळे जगात ऊर्जेची आवश्यकता वाढत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांचे साठे संपत असल्याने सौरऊर्जा, अन्य अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. डॉ. प्राचार्य अनिल पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जे. एल. भोसले व प्रा. विलास साळुंखे यांनी भूमिका मांडली. मिलिंद सुतार यांनी आभार मानले. उद्या, शनिवारी सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होणार आहे. (वार्ताहर)