शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहिती अधिकार हवा

By admin | Updated: December 13, 2014 00:17 IST

प्राचार्य साळुंखे : माहिती अधिकारावर मिरजेत चर्चासत्र सुरू

मिरज : देशाला भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माहितीचा अधिकार प्रभावीपणे राबविण्याची व माहिती अधिकाराचा गैरवापर रोखण्याची गरज असल्याचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगितले. मिरजेत डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे ‘माहिती अधिकार-भ्रष्टाचार रोखण्याचे साधन’ व पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘अपारंपरिक ऊर्जा व व्यावहारिक साधनांचा आर्थिक उपयोग’ या विषयावर आयोजित संयुक्त चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्याहस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. पाटील होते.साळुंखे म्हणाले की, आर्थिक चारित्र्य हा भ्रष्टाचाराला रोखणारा एक प्रभावी मार्ग आहे. माहिती अधिकारामुळे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करता येणे शक्य आहे. आपला देश तीनशे वर्षांच्या मोगलाईच्या, तर दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. मात्र देश भ्रष्टाचारमुक्त करणे सर्वांसमोरील आव्हान आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपल्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सात्त्विक व सकारात्मक विचारांचा ध्यास घेऊन शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडविली. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, वाढत्या औद्योगिक विकासामुळे जगात ऊर्जेची आवश्यकता वाढत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांचे साठे संपत असल्याने सौरऊर्जा, अन्य अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. डॉ. प्राचार्य अनिल पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जे. एल. भोसले व प्रा. विलास साळुंखे यांनी भूमिका मांडली. मिलिंद सुतार यांनी आभार मानले. उद्या, शनिवारी सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होणार आहे. (वार्ताहर)