शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

By admin | Updated: September 1, 2014 23:57 IST

महावितरणचे दुर्लक्ष : ३0 वर्षांत गेला ६ जणांचा बळी

मानाजी धुमाळ -रेठरेधरण -रेठरेधरण, धुमाळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांना जणू विद्युततारांचा शाप असून, गेल्या ३0 वर्षात ६ जणांचा बळी गेला आहे.रेठरेधरण, धुमाळवाडी परिसरातून २६0 व्होल्ट व ४६0 व्होल्टच्या विद्युततारांचे जाळे विणले असून धुमाळवाडी परिसरातून विद्युत वितरणचे मोठे टॉवर आहेत. त्यातच विद्युत वितरण तारा या धोकादायक असल्याने जमिनीपासून किमान २0 फूट उंचीवर असणे गरजेचे असताना, वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्याने, झाडे पडून तारांचा ताण ढिला झाल्याने तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर झुकलेल्या असतात. काही ठिकाणी तर तारा तुटून पडतात. या तारांचा शॉक बसून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.१९९0 च्या दरम्यान धुमाळवाडी डोंगरावर मोठ्या टॉवरच्या तारा जमिनीपासून पंधरा फुटावर होत्या. त्यावेळी शाळकरी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय जाधव (वय १३) व प्रताप सखाराम धुमाळ (१३) यांनी खेळण्याच्या नादात तारेवर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे तारेजवळ मोठा स्फोट होऊन त्यांना भाजल्याने या दोन्ही मुलांना प्राण गमवावा लागला होता.१९८0 च्या दशकात रेठरेधरण येथील लेंढूरी ओढ्यानजीक असणाऱ्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग चंद्रू पाटील यांचा मृत्यू झाला होता. तसेच रेठरेधरण-शिराळा रोडनजीक असलेल्या डी. पी.ची दुरुस्ती करण्यासाठी पोलवर चढलेले वायरमन जमादार यांना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.२00२ मध्ये सर्जेराव रंगराव पाटील या शेतकऱ्याचा शेतातील उसात तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता, तर असाच प्रकार ४ आॅगस्ट २0१४ रोजी घडला. यामध्ये सांगलीच्या अग्निशमन दलातील कर्मचारी तुकाराम उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उठत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज...आतापर्यंत रेठरेधरण व धुमाळवाडी या दोन गावातील ६ जणांना शॉक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व घटना अंगावर शहारा आणणाऱ्या असून, वीज वितरण कंपनीने यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तारा खाली लोंबकळत आहेत, त्यांचा वेळीच ताण काढणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतातून तारा गेल्या आहेत, तेथील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.