शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

By admin | Updated: September 1, 2014 23:09 IST

महावितरणचे दुर्लक्ष : ३0 वर्षांत गेला ६ जणांचा बळी

मानाजी धुमाळ - रेठरेधरण -रेठरेधरण, धुमाळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांना जणू विद्युततारांचा शाप असून, गेल्या ३0 वर्षात ६ जणांचा बळी गेला आहे.रेठरेधरण, धुमाळवाडी परिसरातून २६0 व्होल्ट व ४६0 व्होल्टच्या विद्युततारांचे जाळे विणले असून धुमाळवाडी परिसरातून विद्युत वितरणचे मोठे टॉवर आहेत. त्यातच विद्युत वितरण तारा या धोकादायक असल्याने जमिनीपासून किमान २0 फूट उंचीवर असणे गरजेचे असताना, वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्याने, झाडे पडून तारांचा ताण ढिला झाल्याने तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर झुकलेल्या असतात. काही ठिकाणी तर तारा तुटून पडतात. या तारांचा शॉक बसून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.१९९0 च्या दरम्यान धुमाळवाडी डोंगरावर मोठ्या टॉवरच्या तारा जमिनीपासून पंधरा फुटावर होत्या. त्यावेळी शाळकरी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय जाधव (वय १३) व प्रताप सखाराम धुमाळ (१३) यांनी खेळण्याच्या नादात तारेवर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे तारेजवळ मोठा स्फोट होऊन त्यांना भाजल्याने या दोन्ही मुलांना प्राण गमवावा लागला होता.१९८0 च्या दशकात रेठरेधरण येथील लेंढूरी ओढ्यानजीक असणाऱ्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग चंद्रू पाटील यांचा मृत्यू झाला होता. तसेच रेठरेधरण-शिराळा रोडनजीक असलेल्या डी. पी.ची दुरुस्ती करण्यासाठी पोलवर चढलेले वायरमन जमादार यांना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.२00२ मध्ये सर्जेराव रंगराव पाटील या शेतकऱ्याचा शेतातील उसात तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता, तर असाच प्रकार ४ आॅगस्ट २0१४ रोजी घडला. यामध्ये सांगलीच्या अग्निशमन दलातील कर्मचारी तुकाराम उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उठत आहे.