शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

यात्रांमध्ये पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतींचा धुरळा!

By admin | Updated: February 28, 2017 23:39 IST

आशा पल्लवीत : विधी व न्याय विभागाला प्रस्ताव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शौकिनांमध्ये उत्साह

सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना विशेष महत्त्व आहे. त्यातील बहुतांश गावातील यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहेत. साहजिकच यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल होते. पण गेल्या काही महिन्यांपासून बंदी घातल्याने शर्यतींचा धुरळा बसला. बैलगाड्या शर्यतींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री पातळीवर हालचाली सुरू झाल्याने बसलेला धुरळा पुन्हा उडण्याची आशा निर्माण झाली आहे.पाणीदार सातारा जिल्ह्यात जागोजागी उसाचे फड पाहायला मिळतात. येथील शेतकरीही सधन त्यामुळे शेतात नवनवे प्रयोग करत असतानाच ते हौस, छंद जोपासण्यात कुठेही मागे नाही. अनेकांनी जातिवंत जनावरांचे संगोपन केले आहे. त्यासाठी दर महिन्याला हजारो रुपये खर्च करत आहेत. गावोगावच्या यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्याची जिल्ह्यातील पूर्वापार परंपरा. यासाठी जातिवंत खिलार बैलांची गरज असते. त्यांच्या किमतीही तशाच असतात. त्यांना सांभाळणे, त्यांचा खुराक यांचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. तरीही पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम करणारे शेतकरी या बैलांवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतात. या बैलांनीही मालकाचं नाव राखलं आहे. अनेक बैलांनी मालकांना ‘ट्रॉफीच्या ट्रॉफी’ मिळवून दिल्या आहेत. काही शर्यतींमध्ये तर चांदीचं कडंही मिळत आहे. त्यामुळे या बैलगाडी मालकांचा रुबाब संपूर्ण पंचक्रोशीत वाढतो. या परंपरेला गेल्या काही दिवसांमध्ये ग्रहण लागले. या शर्यतींवर बंदी आली अन् यात्रेतील शर्यतींचा धुरळा बसला. तरुणांची यात्रेविषयी मजाच निघून गेली. पण तरीही या निर्णयाचा मान राखत कोठेही शर्यती घेतल्या नाहीत; पण या बैलांना केवळ सांभाळण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे बंदी हटवून तमिळनाडूतील जल्लिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातही शर्यती सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सोमवार, दि. ६ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यातील बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कायद्यात तरतुदी करण्याबाबत चर्चा होऊ शकते. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शर्यतींबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. (प्रतिनिधी)जल्लिकट्टूने दिलं बळ...महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आहे. याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. पण गेल्या महिन्यात जल्लिकट्टूवरील बंदी हटविण्यासाठी तमिळनाडूत मोठं आंदोलन झालं. तेथील जनता रस्त्यावर उतरली. त्यामुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना बळ मिळालं. येथील अनेक संघटनांनी जल्लिकट्टूच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचवेळी जिल्ह्णातही आंदोलन करत महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.