शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

यात्रांमध्ये पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतींचा धुरळा!

By admin | Updated: February 28, 2017 23:39 IST

आशा पल्लवीत : विधी व न्याय विभागाला प्रस्ताव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शौकिनांमध्ये उत्साह

सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना विशेष महत्त्व आहे. त्यातील बहुतांश गावातील यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहेत. साहजिकच यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल होते. पण गेल्या काही महिन्यांपासून बंदी घातल्याने शर्यतींचा धुरळा बसला. बैलगाड्या शर्यतींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री पातळीवर हालचाली सुरू झाल्याने बसलेला धुरळा पुन्हा उडण्याची आशा निर्माण झाली आहे.पाणीदार सातारा जिल्ह्यात जागोजागी उसाचे फड पाहायला मिळतात. येथील शेतकरीही सधन त्यामुळे शेतात नवनवे प्रयोग करत असतानाच ते हौस, छंद जोपासण्यात कुठेही मागे नाही. अनेकांनी जातिवंत जनावरांचे संगोपन केले आहे. त्यासाठी दर महिन्याला हजारो रुपये खर्च करत आहेत. गावोगावच्या यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्याची जिल्ह्यातील पूर्वापार परंपरा. यासाठी जातिवंत खिलार बैलांची गरज असते. त्यांच्या किमतीही तशाच असतात. त्यांना सांभाळणे, त्यांचा खुराक यांचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. तरीही पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम करणारे शेतकरी या बैलांवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतात. या बैलांनीही मालकाचं नाव राखलं आहे. अनेक बैलांनी मालकांना ‘ट्रॉफीच्या ट्रॉफी’ मिळवून दिल्या आहेत. काही शर्यतींमध्ये तर चांदीचं कडंही मिळत आहे. त्यामुळे या बैलगाडी मालकांचा रुबाब संपूर्ण पंचक्रोशीत वाढतो. या परंपरेला गेल्या काही दिवसांमध्ये ग्रहण लागले. या शर्यतींवर बंदी आली अन् यात्रेतील शर्यतींचा धुरळा बसला. तरुणांची यात्रेविषयी मजाच निघून गेली. पण तरीही या निर्णयाचा मान राखत कोठेही शर्यती घेतल्या नाहीत; पण या बैलांना केवळ सांभाळण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे बंदी हटवून तमिळनाडूतील जल्लिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातही शर्यती सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सोमवार, दि. ६ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यातील बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कायद्यात तरतुदी करण्याबाबत चर्चा होऊ शकते. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शर्यतींबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. (प्रतिनिधी)जल्लिकट्टूने दिलं बळ...महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आहे. याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. पण गेल्या महिन्यात जल्लिकट्टूवरील बंदी हटविण्यासाठी तमिळनाडूत मोठं आंदोलन झालं. तेथील जनता रस्त्यावर उतरली. त्यामुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना बळ मिळालं. येथील अनेक संघटनांनी जल्लिकट्टूच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचवेळी जिल्ह्णातही आंदोलन करत महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.