शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ई-मीटर तपासणीअभावी रिक्षांचे पासिंग थांबले!

By admin | Updated: December 7, 2015 00:30 IST

जिल्ह्यातील रिक्षाचालक संतप्त : वजन-मापे विभागाकडून आठवड्यातून केवळ दोनवेळा तपासणी

सचिन लाड -- सांगली -रिक्षातील ई-मीटर तपासणी वजन-मापे विभागाकडे सोपविण्यात आली आहे. रिक्षा पासिंगला नेण्यापूर्वी चालकांना वजन-मापे विभागात मीटरची तपासणी करुन त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊनच पुढे जावे लागत आहे. पण वजन-मापे विभागाने आठवड्यातून केवळ दोनवेळा तपासणीसाठी वेळ दिला आहे. मीटर तपासणीच्या नावाखाली जवळपास तीनशे रुपये मोजावे लागत आहेत. एवढे करूनही वेळेत तपासणीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने, शेकडो रिक्षांचे पासिंग थांबले आहे. आरटीओ कार्यालयाकडून वर्षातून एकवेळ रिक्षाची ‘फिटनेस’ (पासिंग) तपासणी केली जाते. यासाठी चालकांना रिक्षा सुसज्ज करुन न्यावी लागते. तीन वर्षापूर्वी रिक्षात ‘ई-मीटर’ बसविण्यात आले. हे मीटर सुरू आहे का नाही, याची तपासणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) कार्यालयाकडे होती. यासाठी ते केवळ पन्नास रुपये शुल्क आकारत होते. पासिंगला जाण्यापूर्वी चालक आयटीआयमध्ये रिक्षा नेत होते. तिथे मीटरची तपासणी करुन त्याचे एक किलोमीटर अंतरापर्यंत रीडिंग पडते का, याची पाहणी केली जायची. त्यानंतर ते मीटर सुसज्ज आहे, असे प्रमाणपत्र घ्यायचे. मात्र शासनाने ५ जून २०१५ पासून मीटर तपासणीची जबाबदारी वजन-मापे विभागाकडे सोपविली आहे. या विभागाने सुरुवातीपासूनच मीटर तपासणी करण्यास वेळ देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे दररोज रिक्षा पासिंगला नसतात. या विभागाने शंभरफुटी रस्त्यावर मीटर तपासणीची सोय केली आहे. ते आठवड्यातून बुधवार आणि गुरुवारी या दोनच दिवशी तपासणीला येत असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रिक्षाचालकांची गर्दी असते.मीटर तपासणीसाठी दोनशे दहा रुपये शुल्क आकारले जात आहे. रिक्षात बसून ते एक किलोमीर अंतरापर्यंत जाऊन येतात. या अंतरानुसार मीटरचे रीडिंग पडते का नाही, हे पाहून ते प्रमाणपत्र देत आहेत. तत्पूर्वी चालकांना मीटर सुस्थितीत आहे का नाही, याची बाहेरून तपासणी करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी पुन्हा शंभर-दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. दोन्हीकडील खर्च तीनशे ते चारशे रुपयांच्या घरात जात आहे. पैसे जाऊनही वेळेत तपासणी करुन मिळत नाहीत. वजन-मापे अधिकारी आठवड्यातून एकदाच येत असले तरी, ते कोणत्या वारी येतील, याचा नेम नसतो. त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय बंद ठेवून तपासणीसाठी रांगेत जाऊन थांबावे लागते. वेळेत तपासणी होत नसल्याने पासिंग होत नाही. पासिंगची मुदत संपली तरी आरटीओ कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रिक्षाचालकांना दणकाअनेक रिक्षात आजही ई-मीटर नाही. जरी असले तरी ते प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. अनेकदा आरटीओंनी सांगूनही मीटर बसविले नाही. त्यामुळे मीटर बसविल्याशिवाय पासिंग केले जाणार नाही. तसेच मीटर सुस्थितीत आहे का नाही, याबाबतचे वजन-मापे विभागाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी चालकांना आठवडाभर वजन-मापे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहे. वजन-मापे अधिकारी तपासणी करीत असले तरी, मीटर दुरुस्ती करणाऱ्याच्या दुकानातून प्रमाणपत्र आणायला जावे लागते. तरीही प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने रिक्षाचालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चारशे-पाचशे रुपये खर्च करुनही वजन-मापे विभागाकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नाही. सकाळी नऊपासून ते रात्री आठपर्यंत रिक्षाचालकांना तपासणीसाठी थांबावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे आयटीआय कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळण्याची सोय करावी; अन्यथा आंदोलन उभे केले जाईल.- महेश चौगुले, जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक अ‍ॅपे रिक्षा संघटना, मिरजमीटर तपासणी वजन-मापे विभागाकडे देण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला आहे. शासनस्तरावर यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही व तसे आदेश नाहीत. तपासणीसाठी लागणारे कर्मचारी व यंत्रसामग्री पुरविली गेली नाही. आमचे काम पाहून हे काम करावे लागत आहे. त्यामुळे तपासणीला विलंब लागतो. - पांडुरंग बिरादार, सहायक नियंंत्रक,वजन-मापे विभाग, सांगली.