शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

कराची शंभर टक्के वसुलीच्या गावांना बक्षीस

By admin | Updated: July 14, 2017 23:08 IST

कराची शंभर टक्के वसुलीच्या गावांना बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करणाऱ्या गावांना बक्षीस देण्यात येईल. तसेच प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के पाण्याचे नळ कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी गटविकास अधिकारी आणि खातेप्रमुखांना दिल्या. तसेच जिल्हा परिषदेने यावर्षी यशवंत पंचायत राज अभियानात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि. १७ रोजी होत आहे. याच्या तयारीसाठी दहा पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह खातेप्रमुखांची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेत झाली. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, समाजकल्याण समितीचे सभापती ब्रह्मदेव पडळकर, बांधकाम व अर्थ समिती सभापती अरुण राजमाने, शिक्षण व आरोग्य समिती सभापती तमण्णगौडा रवी-पाटील आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीचे उत्पन्न वाढीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विभागाची वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळी योजना पाहिजे. पाणीपट्टी, घरपट्टीची शंभर टक्के वसुली करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत. कराची शंभर टक्के वसुली करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के पाणी कनेक्शन दिली पाहिजेत. यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असून, पाणी योजना चांगल्या पध्दतीने चालण्यास मदत होणार आहे. या प्रश्नावर सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, जिल्हा परिषद पदाधिकारी तुम्हाला शंभर टक्के मदत करतील, असा विश्वासही देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिला.यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जिल्हा परिषदेने भाग घेतला पाहिजे. यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगली प्रतिमा निर्माण होईल. विकासकामांना गती मिळणार, असेही देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार यशवंत पंचायत राज अभियानात जिल्हा परिषदेने भाग घेण्यास अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनीही सहमती दिली. संग्रामसिंह देशमुख पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी जुन्या कागदावरून अहवाल सादर करण्याची पध्दत बदलली पाहिजे. जनतेसमोर त्यांच्या हिताच्या नवीन योजना मांडल्या पाहिजेत. पाण्याचे स्रोत निश्चित : करूनच योजनांना मंजुरीज्या गावामध्ये पाण्याचा स्रोत चांगला नाही, अशा ठिकाणी यापुढे पाणी योजनांना मंजुरी देण्यात येणार नाही. याबाबत अधिकाऱ्यांनीही कठोर भूमिका घ्यावी. कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करूनही पाण्याचा स्रोत बंद असल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी अडकून पडला आहे. हे प्रकार थांबविण्यासाठीच पाण्याचा स्रोत निश्चित आणि चांगला असेल, याची खात्री केल्याशिवाय पाणी योजनांना मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात येणार आहे, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.