शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिळगंगा’चे पुनरुज्जीवन लोकसहभागातूनच पूर्ण

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

राजू शेट्टी : परिसरातील पाणी प्रश्न सुटणार, नदीतील पाण्याचे पूजन

पेठ : शासनाकडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पेठ येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही शासनाने मोठी मदत केली आहे. तसेच याला लोकसहभागाची साथ मिळाल्याने कमी कालावधित लाखमोलाचे काम झाले आहे. तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे भविष्यातील पाणी टंचाई मिटली आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीतील पाण्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, नायब तहसीलदार शैलजा पाटील, सरपंच श्रीमती सुनीता पवार, संपतराव पवार, प्रा. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, जलशिवार योजनेंतर्गत ग्रामप्रकाश शिवराज्य संस्थेच्या माध्यमातून तिळगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. आगामी काळात ही नदी बारमाही वाहू लागेल.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार आहे.प्रारंभी पं. स. सदस्य प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, अ‍ॅड. एस. यु. संदे, डॉ. सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यशवंत ग्लुकोजचे संचालक संदीप पाटील, शांताराम देशमाने, विलास चौथाई, मंडल अधिकारी गोपी वडर, तलाठी टी. आर. काळे, नीता भोसले, राहुल पाटील, शेख, विलास पाटील, श्रीरंग कदम, रमेश कदम, धुळाप्पा जानकर उपस्थित होते. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)समन्वय : कृतीचाशासन, लोकसहभाग, प्रशासन यांच्यातील समन्वयामुळेच आपण कितीही मोठे काम सहजपणे करू शकतो, हेच तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवन कामावरून स्पष्ट झाले आहे. यापुढेही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.