शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला फौजदाराची बदली

By admin | Updated: November 7, 2014 23:44 IST

अखेर उचलबांगडी : अधिकाऱ्याला हलविले

सांगली : लाचप्रकरणी अटक झालेल्या जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस फौजदार सीमा आघाव यांची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली. ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक पी. एम. कदम यांचीही मुख्यालयाकडे बदली केली आहे. आर. ई. शेख यांच्याकडे जतचा कार्यभार सोपविला आहे.बिळूर (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी झाली होती. याप्रकरणी परस्पराविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती. याचा तपास आघाव यांच्याकडे होता. यातील एका फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीतील संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास आघाव टाळाटाळ करीत होत्या. यासाठी त्यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती. फिर्यादीने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने सापळा लावला होता. फिर्यादीकडून लाच घेण्यास आघाव यांनी नकार दिला. ती त्यांनी त्यांचा पती दत्ता बडे याच्याकडे देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारताच दोघांनाही पकडले होते.लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, अहवाल येताच आघाव यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. त्यांच्याविषयी तक्रारी होत्या. त्यांना एक-दोन वेळा कामात सुधारणा करण्याची ताकीद दिली होती. ठाण्याचे अधिकारी कदम यांनाही सुनावले होते. मात्र तरीही त्यांच्या कामात बदल झाला नाही. यामुळे दोघांच्याही मुख्यालयात बदल्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)पोलीस दलास हादरालाचलुचपत विभागाकडून लाचखोरांना पकडण्याची होत असलेली कारवाई नजरेत भरण्यासारखी आहे. मात्र त्यांच्या जाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सापडण्याचे प्रमाण मोठे असल्याने, पोलीस दलाच्यादृष्टीने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. विट्यातील हवालदार महादेव खोत याच्या अटकेनंतर दुसऱ्याचदिवशी सीमा आघाव लाच घेताना सापडल्याने पोलीस दलास हादरा बसला आहे.