शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग

By admin | Updated: June 4, 2017 23:32 IST

मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेत संघर्ष समितीच्या प्रयोगाची पुन्हा एकदा तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आठ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना संघर्ष समिती आव्हान देणार आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेतील नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांशी सवतासुभा आहे. पदे मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या मिरजेतील नगरसेवकांनी प्रभाग समिती चारमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना प्रभाग समिती चारमधील मिरज पॅटर्न गट मोडीत काढता आलेला नाही. गत निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांनी मैदानाबाहेर काढलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समिती मिरजेतील २२ पैकी १४ सदस्य दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्यानंतर मिरजेतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली होती; मात्र भाजपशी बोलणी फिसकटल्यानंतर संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढवून सत्तेत सहभाग मिळविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यापूर्वीही इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीने चार ते पाच सदस्यांच्या बळावर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपद मिळविले होते. मिरजेत नायकवडी विरुध्द जामदार यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष आहे. जामदार गट सत्तेत असल्याने नायकवडी गटाची विरोधी भूमिका आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संघर्ष समितीने महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसलाही अनेकवेळा धक्के दिले आहेत. महापालिका निवडणुकीत संघर्ष समितीतर्फे मिरजेतील २२ पैकी १४ नगरसेवक निवडणूक लढवून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आव्हान देणार आहेत. काँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी तक्रार करून इद्रिस नायकवडी यांना मैदानाबाहेर काढले होते. मात्र यावेळी इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. संघर्ष समितीच्या बैठकीस माजी महापौर विवेक कांबळे, मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी, अल्लाउद्दीन काझी, शुभांगी देवमाने, मालन हुलवान, शिवाजी दुर्वे, जरीना बागवान उपस्थित होते. मिरजेतील आणखी काही सदस्य व सांगलीतील चार सदस्य संपर्कात असल्याचा समितीचा दावा आहे. सत्तेसाठी एकत्र येण्याबाबत ख्याती असलेली मिरजेतील महत्त्वाकांक्षी असलेली नेतेमंडळी आता पुन्हा एकत्र आली आहेत. मात्र सत्तेचे गणित जमले नाही, तर ही मंडळी किती दिवस एकत्रित राहणार, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मात्र प्रस्थापित नगरसेवक व त्यांच्या प्रभागात असलेल्या प्रभावामुळे संघर्ष समितीच्या आव्हानाचा सर्वच राजकीय पक्षांना सामना करावा लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चापमाजी महापौर इद्रिस नायकवडी म्हणाले, सर्व पक्षांच्या नेतेमंडळींकडून नागरिकांचा व सदस्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. यामुळे महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी व नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली सांगली-मिरजेतील अनेक नगरसेवक एकत्र आले आहेत. केवळ सत्ता मिळविणे हे आमचे ध्येय नसून, संघर्ष समितीच्या सदस्यांमुळे महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे.