शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

दुष्काळग्रस्तांचं जीणं ‘फेसाटी’त मांडलं: नवनाथ गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:18 IST

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील ...

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारतीच्या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे या दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. गोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, जि. प. सदस्य सरदार पाटील, रा. स. प. अध्यक्ष अजित पाटील, मराठी-कन्नड साहित्य परिषदेचे डॉ. रवींद्र आरळी, डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित होते.मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की, शाळेमध्ये शिकवत असताना लहान मुलांसमोर आदर्श उभे करण्यासाठी मी लिहित गेलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी यशाचे शिखर गाठले, त्यांच्यावर लिहित गेलो आणि त्यातीलच एक कथा आठवीच्या बाल भारती या पुस्तकात समाविष्ट झाली. त्यामुळे लिखाणाची प्रेरणा वाढली.प्राचार्य डॉ. ढेकळे यांच्याहस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारती या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सत्कार केला.यावेळी डॉ. श्रीकांत कोकरे यांनी गोरे व ऐनापुरे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनाचा धगधगता प्रवास प्रेक्षकांसमोर उभा केला. मराठी विभागप्रमुख प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कुमार इंगळे यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. सागर सन्नके यांनी आभार मानले.जत तालुक्याच्या वैभवात भरडॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले की, जीवनामध्ये अनेक संकटे येतात. त्या संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य पुस्तकामध्ये असते. विचारांची एकरूपता आणि सामाजिक संवेदनशीलता एकत्र आले की नवीन साहित्य जन्माला येते. ‘फेसाटी’ कादंबरीस साहित्य अकादमीसारखा मोठा पुरस्कार प्राप्त झाला, ही जतच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे.