शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत. २८ ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत. २८ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत निर्बंध लागू राहतील. चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री आठनंतर बंद राहतील.

जिल्हाभरात जमावबंदी लागू केली असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचा भंग केल्यास प्रती व्यक्ती एक हजार रुपये इतका दंड केला जाईल. बगीचे, मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. मास्क नसल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट सील केली जाणार आहेत. त्याशिवाय दंड आकारणी व कायदेशीर कारवाईदेखील होईल.

गृह अलगीकरण होणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित डॉक्टरांनी स्थानिक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेला देणे सक्तीचे आहे. गृह अलगीकरणात राहिलेल्या रुग्णाच्या घरावर तसा फलक लावावा लागेल. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा लागेल. संबंधित रुग्ण घरातून बाहेर पडल्यास त्याचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येणार आहे.

सरकारी कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाची कामे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. एखाद्या बैठकीला येण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडून प्रवेशपत्र दिले जाईल. पत्राशिवाय प्रवेश नसेल.

सर्व धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखूनच भाविकांना प्रवेश देता येईल. दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणासारख्या सुविधाही द्यायच्या आहेत. मास्कचा वापर व शरीराचे तापमान मोजूनच धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करता येईल. सार्वजनिक वाहतुकीस सशर्त परवानगी आहे. अटींचा भंग केल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.

चौकट

असे असतील निर्बंध

- रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

- चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद, होम डिलिव्हरीला परवानगी

- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, सभागृह व नाट्यगृहातही कार्यक्रमांना बंदी

- लग्नासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई.