शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

By admin | Updated: October 3, 2016 00:23 IST

शांततेच्या वातावरणात ग्रामसभा : काही ठिकाणी सभा तहकूब; विविध ठराव एकमताने मंजूर

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी, मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करावे आणि या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांबाबतचे ठराव सर्वानुमते मंजूर केले. दरम्यान, कडेपूर, शिरसगावसह काही ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्या. कोरमअभावी तहकूब झालेल्या गावांमध्ये लवकरच पुन्हा ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबतचे ठराव घेणारच आहे, असे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सांगितले. दि. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गावोगावी ग्रामसभा शांततेच्या वातावरणात झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर, घटनात्मक बदल करून आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील नराधमांना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, शेतीमालाला भाव देण्यासाठी स्वामीनाथन् समितीचा अहवाल स्वीकारावा आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागण्यांचा ठराव अनेक ग्रामसभांमध्ये करण्यात आला. चिंचणी (अंबक) येथील काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस अनुपस्थित होते. या सदस्यांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. देवराष्ट्रे येथे ग्रामसचिवालय इमारतीमधील दुकानगाळे भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा विषय ऐरणीवर आला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा नियमानुसार निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणाचे ठराव केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर) ग्रामसभांबाबत अधिकारी अनभिज्ञ कडेगाव तालुक्यातील किती ग्रामसभा झाल्या आणि किती ग्रामसभा तहकूब झाल्या, याबाबत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास विचारणा केली असता, याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही, असे ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांना किती गावात ग्रामसभा झाल्या, कशा झाल्या, ठराव कोणते झाले याची माहिती नव्हती. दरम्यान, चिंचणी येथील तरूणांनी मराठा आरक्षण ठराव घेण्याबाबतचा निश्चय केला होता. परंतु कोरम पूर्ण होत नव्हता. यावेळी तरूणांनी घरोघरी फिरून ग्रामस्थांना ग्रामसभेत आणले. मग कोरम पूर्ण झाला आणि मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर झाला.