शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

By admin | Updated: October 3, 2016 00:23 IST

शांततेच्या वातावरणात ग्रामसभा : काही ठिकाणी सभा तहकूब; विविध ठराव एकमताने मंजूर

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी, मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करावे आणि या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांबाबतचे ठराव सर्वानुमते मंजूर केले. दरम्यान, कडेपूर, शिरसगावसह काही ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्या. कोरमअभावी तहकूब झालेल्या गावांमध्ये लवकरच पुन्हा ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबतचे ठराव घेणारच आहे, असे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सांगितले. दि. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गावोगावी ग्रामसभा शांततेच्या वातावरणात झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर, घटनात्मक बदल करून आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील नराधमांना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, शेतीमालाला भाव देण्यासाठी स्वामीनाथन् समितीचा अहवाल स्वीकारावा आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागण्यांचा ठराव अनेक ग्रामसभांमध्ये करण्यात आला. चिंचणी (अंबक) येथील काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस अनुपस्थित होते. या सदस्यांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. देवराष्ट्रे येथे ग्रामसचिवालय इमारतीमधील दुकानगाळे भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा विषय ऐरणीवर आला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा नियमानुसार निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणाचे ठराव केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर) ग्रामसभांबाबत अधिकारी अनभिज्ञ कडेगाव तालुक्यातील किती ग्रामसभा झाल्या आणि किती ग्रामसभा तहकूब झाल्या, याबाबत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास विचारणा केली असता, याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही, असे ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांना किती गावात ग्रामसभा झाल्या, कशा झाल्या, ठराव कोणते झाले याची माहिती नव्हती. दरम्यान, चिंचणी येथील तरूणांनी मराठा आरक्षण ठराव घेण्याबाबतचा निश्चय केला होता. परंतु कोरम पूर्ण होत नव्हता. यावेळी तरूणांनी घरोघरी फिरून ग्रामस्थांना ग्रामसभेत आणले. मग कोरम पूर्ण झाला आणि मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर झाला.