शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपणास विरोध

By admin | Updated: May 31, 2017 00:15 IST

सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपणास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपण करण्यास तेथील वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यांना रोखले. वृक्षारोपणासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना, पर्यावरणप्रेमींना वृ क्षारोपण करण्यापासून रोखणाऱ्या वनक्षेत्रपाल साळी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे राजकीय नेत्यांनी लावलेली झाडे काही कालावधीनंतर जळून गेली आहेत.या प्रकारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर खानापूर तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित जाधव (आळसंद), सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचे पुत्र सु. धों. मोहिते (मोहिते वडगाव) व सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे (वांगी) आदींसह कार्यकर्त्यांचा फौजफाटा सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपणासाठी रोपे घेऊन दाखल झाला. त्याठिकाणी त्यांनी खड्ड्यांची स्वच्छता करून झाडे लावण्याचा प्रयत्न केला असता, वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी, राजकीय नेत्यांनी लावलेल्या झाडांच्या ठिकाणी असे कोणीही येऊन झाडे लावली, तर तो राजकीय नेत्यांचा अपमान होईल, अशी अरेरावीची भाषा वापरून वृक्षारोपण करण्यास कार्यकर्त्यांना विरोध केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला व वृक्षारोपण न करताच ते परत फिरले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून वृक्षारोपण करू न देणाऱ्या वनक्षेत्रपाल साळी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.