शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरवाडच्या ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा : योजना रखडल्याने पाणीप्रश्न गंभीर

मिरज : नरवाड (ता. मिरज) येथील पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेली राष्ट्रीय पेयजल योजना अधिकारी व ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे रखडल्याने पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीप्रश्नाने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी मिरज पंचायत समितीवर धडक मारली व तातडीने पाणीप्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला. नरवाडसह वाड्या-वस्तीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २ कोटी ५ लाख रूपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर आहे. दीड वर्षात पूर्ण होणारी ही योजना सात वर्षापासून रखडली आहे. निधीतील १ कोटी ७० लाख रूपये ठेकेदाराने उचलले आहेत. केलेले काम वादात सापडले आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश असलेल्या नरवाडसह गायरानवाडी, बाराकोठडी, लक्ष्मीनगर भागातील ग्रामस्थांना योजना अपूर्ण असल्याने पाण्याच्या एका घोटासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी विकतचे पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. प्रशासनही ग्रामस्थांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, पाणीप्रश्नाने त्रस्त असलेल्या बारकोठडी परिसरातील ग्रामस्थांनी पाणीप्रश्नासाठी सोमवारी मिरज पंचायत समितीवर धडक मारली. तातडीने पाणीप्रश्न न सोडविल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिला. गावासाठी कोट्यवधीची पाणी योजना मंजूर आहे. अशात या गावाची आणेवारीही ५० पैशापेक्षा अधिक असल्याने, पर्यायी व्यवस्था करण्यातही प्रशासनासमोर अडचणी आहेत. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणीनरवाड येथील राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण केल्याशिवाय पिण्याचा पाणीप्रश्न सुटणे शक्य नाही. गेल्या सात वर्षात पाणी योजना पूर्ण होण्यासाठी पंचायत समितीच्या सभेत बाबासाहेब कांबळे पाठपुरावा करीत आहेत. ठेकेदारांवर कारवाईच्या नोटिसा बाजाविल्या जातात, पण कारवाई होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठेकेदारावर कारवाई करण्याची मानसिकता नसल्याने, योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. ग्रामस्थांचे सुरू असलेले हाल लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेऊन रखडलेल्या पाणी योजनेचा पर्दाफाश करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.