शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आरक्षित समाजाने एकसंध राहावे सावळाराम अणावकर : ओरोस येथे आरक्षित समाज महासंघाची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 21:41 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, संविधानाची मोडतोड करून आरक्षित समाजाच्या हक्कांंवर गंडांतर आणण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत हा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आरक्षित

ओरोस : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, संविधानाची मोडतोड करून आरक्षित समाजाच्या हक्कांंवर गंडांतर आणण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत हा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आरक्षित समाजाने एकसंध राहणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी केले.

मराठा समाज आरक्षणासाठी रण पेटलेले असतानाच शासनाच्या ५२ टक्के आरक्षणात समाविष्ट असलेला समाजही आपल्या हक्कांसाठी एकत्रित येत आहे. जिल्ह्यात ४४ समाजांच्या संघटना अस्तित्वात आहेत. या समाजांचा अंतर्भाव हा सध्याच्या आरक्षणात होत आहे. राजकीय वल्कले बाजूला ठेवत सामाजिक व शैक्षणिक सुविधांबाबतचे विचारमंथन महासंघाने सुरू केले आहे. काही नेते मंडळींनी पुढाकार घेत आरक्षित समाज महासंघाची उभारणी केली आहे. या संघाची बैठक शनिवारी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात देवळी समाज अध्यक्ष तथा कोअर कमिटी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी राजकीय वल्कले बाजूला ठेवून सामाजिक भावनेने एकत्रित यावे, कोणत्या मुद्द्यांसाठी एकत्र लढणार याची आदर्श आचारसंहिता तयार करण्यात यावी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महासंघाने स्वतंत्र उमेदवार द्यावेत, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यात याव्यात, कोणाच्याही विरोधासाठी नाही तर सामाजिक घडीचा समतोल राखण्यासाठी एकत्रित पुढे जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी शासनाच्या नोकर भरती थांंबविण्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठा समाजासाठीचे आरक्षण कायम ठेवून ही भरती प्रक्रिया राबवावी, शासकीय सेवेतील पदोन्नती आरक्षण कायम ठेवावे, मराठा समाजास आरक्षण देताना पूर्वीचे ५२ टक्के आरक्षण कायम ठेवावे, जातीच्या दाखल्यासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, जात पडताळणी मागणीप्रमाणे करून मिळावी, अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा सर्वच आरक्षित समाज घटकांसाठी लागू करावा, बलुतेदारांकडील देवस्थान जमिनी त्यांच्याकडेच ठेवाव्यात, ४४ समाज संघटनांंचे जिल्हाध्यक्ष सदस्य असावेत, या देवस्थान जमिनीमध्येघर बांंधणीस परवानगी घ्यावी, असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.१९ संघटनांच्या जिल्हाध्यक्षांची उपस्थितीया बैठकीला सुतार समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, बौद्धसेवा संघाचे संदीप कदम, वैश्यवाणी समाजाचे सुनील भोगटे, गाबीत समाजाचे कृष्णकांत ताम्हणकर, भंडारी समाजाचे अतुल बंगे, चर्मकार समाजाचे नंदन वेंगुर्लेकर, ठाकर समाजाचे नीलेश ठाकूर, भोई समाजाचे रामचंद्र भोई, मांग गारुडी समाजाचे किशोर चौगुले, भारतीय बौद्ध महासभेचे रावजी यादव, भारिप बहुजन महासंघाचे महेश परुळेकर, नाभिक समाजाचे अनिल अणावकर, वाल्मीकी समाजाचे तेजस पडवळ, कासार समाजाचे चंद्रकांत कासार, बेलदार समाजाचे पी. पी. चव्हाण, लिंंगायत समाजाचे लक्ष्मण लिंगायत, गोसावी समाजाचे जिल्हा संघटक भालचंद्र गोसावी, महाराष्ट्र कुंभार समाजाचे उपाध्यक्ष विलास गुडेकर, सुनील रेडकर, राजन कोरगावकर, अंकुश जाधव, नितीन वाळके, आदींसह विविध समाजबांधव यावेळी उपस्थित होते. सर्व तालुक्यांत बैठक घेऊन तालुकावार समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत. विचार मंथनासाठीचा आरक्षित समाज महासंघाचा मेळावा लवकरच घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.