शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीत आरक्षणप्रश्नी शासनाकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:49 IST

सांगली : अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी व अन्य मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल व ...

सांगली : अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी व अन्य मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल व फसवणूक करण्यात आली आहे, अशी तक्रार ऑल इंडिया पँथर सेनाप्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शासन परिपत्रक काढून मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण मार्ग खुले केल्याचा बडेजाव सुरू केला आहे. या परिपत्रकामधील बेकायदेशीर अटींमुळे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. तसेच यातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पायमल्ली झालेली आहे. भारतीय संविधान कलम १६ नुसार अनुसूचित जाती-जमातीच्या पदोन्नती आरक्षणात कोणत्याही प्रकारचे बंधने घालता येत नाही. असे असताना महाआघाडी सरकारने २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणार असल्याबाबत परिपत्रक काढले आहे. मुळातच बिंदू नामावलीप्रमाणे पदोन्नती आरक्षण देणे कायद्याने बंधनकारक आहे, पण सरकारने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे व संविधानद्रोह केलेला आहे. आरक्षण समितीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांची दिशाभूल केली आहे.

१७ मे २०१८ रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, १५ जून २०१८ रोजी महाराष्ट्र केस संदर्भातील निकाल आणि २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पिठाच्या निकालातून “अनुसूचित जातीचे मागासलेपण मोजण्याची गरज नाही, संख्यात्मक आकडेवारीची गरज नाही” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने जीआर मागे घ्यावा व बिंदू नामावली (रोस्टर) नुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.