शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

मुंडे भगिनींची नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : मुंडे भगिनींनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे. त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, ...

सांगली : मुंडे भगिनींनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे. त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे मत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

शेलार म्हणाले की, ठाकरे सरकार कोरोना स्थितीत केवळ राजकारण करीत आहे. केंद्राकडे बोट करून स्वत:चे गैरनियोजन लपवीत आहे. यात लोकांचा बळी जात असतानाही त्यांना त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे बनले आहे. कोरोनासह आरक्षण, शेतकरी पीक विमा, कर्जमाफी, तरुणांची आत्महत्या, बेरोजगारी अशा प्रत्येक प्रश्नावर अपयशी ठरले आहे.

सरकारमध्ये आपसांत असलेले मतभेद लपून राहिले नाहीत. हे सरकार पडावे म्हणून कुणी प्रयत्न करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या कर्मानेच त्यांचे सरकार पडेल. हे सरकार असेपर्यंत कोरोना नियंत्रित येण्याची चिन्हे नाहीत. लसीकरणावरून राज्य शासनाची केंद्र शासनावर होणारी टीका चुकीची आहे. त्यांनी किती लसी केंद्राकडून घेतल्या, किती वाया घालविल्या याचा हिशेब द्यावा, असे ते म्हणाले.

चौकट

सर्कलचा मुद्दा चुकीचा आहे.

फडणवीस सर्कलमध्ये मुंडे भगिनी नसल्याने त्यांना मंत्रिपद दिले नाही, अशी टीका होत असल्याबद्दल शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, या गोष्टी चुकीच्या आहेत, मात्र मुंडे भगिनींनी त्यांची नाराजी व्यक्त करणे हे चुकीचे नाही.