शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

मुंडे भगिनींची नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : मुंडे भगिनींनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे. त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, ...

सांगली : मुंडे भगिनींनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे. त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे मत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

शेलार म्हणाले की, ठाकरे सरकार कोरोना स्थितीत केवळ राजकारण करीत आहे. केंद्राकडे बोट करून स्वत:चे गैरनियोजन लपवीत आहे. यात लोकांचा बळी जात असतानाही त्यांना त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे बनले आहे. कोरोनासह आरक्षण, शेतकरी पीक विमा, कर्जमाफी, तरुणांची आत्महत्या, बेरोजगारी अशा प्रत्येक प्रश्नावर अपयशी ठरले आहे.

सरकारमध्ये आपसांत असलेले मतभेद लपून राहिले नाहीत. हे सरकार पडावे म्हणून कुणी प्रयत्न करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या कर्मानेच त्यांचे सरकार पडेल. हे सरकार असेपर्यंत कोरोना नियंत्रित येण्याची चिन्हे नाहीत. लसीकरणावरून राज्य शासनाची केंद्र शासनावर होणारी टीका चुकीची आहे. त्यांनी किती लसी केंद्राकडून घेतल्या, किती वाया घालविल्या याचा हिशेब द्यावा, असे ते म्हणाले.

चौकट

सर्कलचा मुद्दा चुकीचा आहे.

फडणवीस सर्कलमध्ये मुंडे भगिनी नसल्याने त्यांना मंत्रिपद दिले नाही, अशी टीका होत असल्याबद्दल शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, या गोष्टी चुकीच्या आहेत, मात्र मुंडे भगिनींनी त्यांची नाराजी व्यक्त करणे हे चुकीचे नाही.