शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.तील लिपिकांच्या बदली; सेवा खंडितचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ८७ लिपिकांना अतिरिक्त ठरवून एक वर्षापूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बदली करण्याचा निर्णय एस.टी. ...

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ८७ लिपिकांना अतिरिक्त ठरवून एक वर्षापूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बदली करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाने घेतला होता. ऐन कोरोना महामहारीच्या काळात या कर्मचाऱ्यांबाबत अन्यायकारक निर्णय घेतला गेल्याने या कर्मचाऱ्यांची वाताहत झाली होती. काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झाले तर बदलीच्या ठिकाणी रूजू न झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली.

या कर्मचाऱ्यांचा अन्यायग्रस्त निर्णय रद्द करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. एस.टी. महामंडळातील कामगारांच्या संघटनांनीही सातत्याने याप्रश्‍नी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार महाव्यवस्थापक माधव काळे यांनी या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश काढले आहेत तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली होती, त्यांचा सेवेतील खंड क्षमापित केला आहे. बदली आदेश रद्द करून मूळ ठिकाणी रूजू करून घेण्याचे आदेश शुक्रवारी काढले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची सेवा मूळ ठिकाणी नियमित करण्याच्या निर्णयामुळे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोटस् :

सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन विभागांतील लिपिकांच्या बदल्या इतर विभागांत करून ऐन कोरोनाकाळात त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे त्रास सहन करावा लागला होता. या कर्मचाऱ्यांचे दु:ख कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परिवहनमंत्री अनिल परब यांनी आमच्या मागणीची दखल घेत अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय दिला.

- हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.