शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

व्यापाऱ्यांचे गाळे काढून घेणार

By admin | Updated: April 26, 2017 23:49 IST

आज नोटिसा : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई

सांगली : विष्णुअण्णा फळ मार्केटमधील कांदा-बटाटा व्यापारी आणि बाजार समिती कर्मचारी यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने तीस व्यापाऱ्यांना फळ मार्केटमधील गाळे काढून घेण्याच्या नोटिसा गुरुवारी दिल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित करीत मालाची विक्री केली. येथील फळ मार्केटमध्ये सोमवारी सकाळी कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा आलेला माल उतरविण्यासाठी मालवाहतूक ट्रक रस्त्यावर लावण्यात आला होता. चार दिवसांपासून फळ मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असल्याने त्या वाहनांची भर पडली आहे. कांदा व्यापाऱ्यांचा ट्रक बाजूला करण्यात यावा, अशी विनंती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केली. मात्र ट्रक बंद पडला असल्याने तो काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यातून वाद टोकाला गेला. बाजार समितीकडून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांना प्रत्येक गाळ्यासाठी एक रुपया भाडे आकारले जाते. चार महिन्यांपूर्वी महिन्याला अडीच हजार रुपये भाडे करण्यात येणार असल्याची नोटीस पाठविली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कांदा, बटाटा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून बाजाराचे स्थलांतर केले आहे. वॉलमार्टच्या आवारामध्ये सलग दुसऱ्यादिवशी व्यापार नेण्यात आला. व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे कांदा-बटाटा व्यापाऱ्यांकडे असलेले तीस गाळे काढून घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्याबाबतची नोटीस गुरुवारी व्यापाऱ्यांना दिली जाणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, फळ मार्केटचे सभापती अजित बनसोडे आणि बाजार समिती सचिव पी. एस. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वाद पेटलाविष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये बाजार समितीकडून मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, म्हणून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित केला आहे. दुसऱ्या दिवशीही येथे कांदा आणि बटाट्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांनी बाजाराचे स्थलांतर केल्यामुळे बाजार समिती प्रशासनानेही कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये तोडग्याऐवजी संघर्ष टोकाला जात आहे.