शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंहांच्या स्मारकाची आताच आठवण का?

By admin | Updated: June 17, 2016 00:29 IST

जयंतरावांना आव्हान : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्टंटबाजीची चर्चा

ंअशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा तालुक्यातील चिकुर्डेचे अभिजित पाटील शिवसेनेत सामील झाल्याने त्यांना आता ‘मातोश्री’वर ताकद दाखवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचा प्रश्न हाती घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही स्टंटबाजी सुरू असल्याची चर्चा तालुक्यातून आहे.अभिजित पाटील एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीला धूळ चारली होती. परंतु मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा दारुण पराभव केला. हा पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला. सांगली जिल्ह्यात काँगे्रस, तर कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांचे नेतृत्व मानून त्यांनी राजकारण केले. कालांतराने काँग्रेसमध्ये काहीही भवितव्य नाही असे लक्षात आल्यानंतर, ऐन लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. या प्रचाराचा प्रारंभ येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या अभिवादनाने करण्यात आला. त्यावेळी कोणालाही क्रांतिसिंहांच्या स्मारकाच्या दुरवस्थेची अथवा तेथे वीज नसल्याची आठवण झाली नाही.विधानसभा निवडणुकीवेळी अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व मानून आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर ते अज्ञातवासात होते. वाळवा-शिराळा तालुक्यात शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या माध्यमातून इस्लामपूर नगरपालिकेत खाते उघडले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्रांतिसिंहांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून थेट आमदार जयंत पाटील यांना आव्हान देऊन स्टंटबाजी चालवली आहे, असे बोलले जात आहे.कोण, काय म्हणाले?क्रांतिसिंह नाना पाटील वाळवा तालुक्याचे भूषण आहेत. त्यांच्या स्मारकाची अवस्था दयनीय आहे. स्मारकातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टकडे आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे. पी. आर. पाटील यांचा यात काहीही संबंध नाही.- अभिजित पाटील, शिवसेना नेते.राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले जाते. येडेमच्छिंद्र स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. याचा अर्थ बांधकाम थकीत बिल ट्रस्टने भरावे, असा नाही. सध्या भाजप, शिवसेनेचे सरकार आहे. बिल अभिजित पाटील यांनी भरून विजेचा प्रश्न मार्गी लावावा.पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू कारखाना.