शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

By admin | Updated: June 8, 2017 23:16 IST

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : चाफळ ते उंब्रज दरम्यानच्या ११ बंधाऱ्यांच्या फळ्या पाटबंधारे विभागाने काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाहून गेला आणि नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले.यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उत्तरमांड नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळू लागली असून, पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका या सर्व शेतकऱ्यांना बसला असून, चाफळ येथील उत्तरमांड नदीवरील धरणातून तातडीने पाणी नदीपात्रात सोडावे, अन्यथा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला.उत्तरमांड नदीवर चाफळ येथे धरण झाले, चाफळ ते उंब्रज दरम्यान जुने आणि नवीन अशा ११ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा केला जातो. यामुळे या नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यातील गावांची सुमारे ६०० हेक्टर जमीन भिजते. या जमिनीना पाणीपुरवठा होतो म्हणून याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी ही पाटबंधारे विभागाकडून घेतली जात असते. सद्य:स्थितीला अजूनही पाऊस पडला नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडबड करून २२ मे नंतर फळ्या काढल्या आणि बंधाऱ्यात असलेले पाणीही वाहून गेले. यामुळे उत्तरमांड नदीपात्र कोरडे पडले असून, ठणठणाट झाला आहे.पिकांना आणि जनावरांना ही पाणी कसे पाजायचे, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.पाऊस पडला नाहीतर या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी कोठून पाजायचे याचे कसलेही नियोजन पाटबंधारे विभागाने केले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके जातील आणि याला करणीभूत पाटबंधारे विभागच राहील. चाफळ येथील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील फळ्या काढून पाणी सोडून दिले ती चूक सुधारण्यासाठी त्यांनी आता चाफळ धरणातून उत्तरमांड नदीत पाणी सोडावे आणि ऐनभरात आलेल्या आमच्या पिकांना जीवदान द्यावे.याबाबत दखल घेऊन पाणी धरणातून सोडले नाही तर मात्र आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उंब्रज येथून जाणारा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहोत, असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.बंधाऱ्यावरील फळ्या ३१ मे पूर्वी काढाव्यात, असा शासनाचा नियम आहे. या नियमानुसार आम्ही बंधाऱ्यावरील फळ्या काढल्या आहेत; पण पाऊस पडला नाही, यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे आम्ही बुधवारी लघू पाटबंधारे विभाग सातारा यांच्याकडे पाणी सोडावे, अशी लेखीपत्राने मागणी केली आहे. पाणी धरणातून सोडण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्या विभागाकडून ही तातडीने पाणी सोडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.- शामराव नांगरे, शाखा अभियंता, तारळी व उत्तर मांड उपसासिंचन विभाग तारळे