शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

By admin | Updated: June 8, 2017 23:16 IST

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : चाफळ ते उंब्रज दरम्यानच्या ११ बंधाऱ्यांच्या फळ्या पाटबंधारे विभागाने काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाहून गेला आणि नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले.यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उत्तरमांड नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळू लागली असून, पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका या सर्व शेतकऱ्यांना बसला असून, चाफळ येथील उत्तरमांड नदीवरील धरणातून तातडीने पाणी नदीपात्रात सोडावे, अन्यथा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला.उत्तरमांड नदीवर चाफळ येथे धरण झाले, चाफळ ते उंब्रज दरम्यान जुने आणि नवीन अशा ११ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा केला जातो. यामुळे या नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यातील गावांची सुमारे ६०० हेक्टर जमीन भिजते. या जमिनीना पाणीपुरवठा होतो म्हणून याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी ही पाटबंधारे विभागाकडून घेतली जात असते. सद्य:स्थितीला अजूनही पाऊस पडला नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडबड करून २२ मे नंतर फळ्या काढल्या आणि बंधाऱ्यात असलेले पाणीही वाहून गेले. यामुळे उत्तरमांड नदीपात्र कोरडे पडले असून, ठणठणाट झाला आहे.पिकांना आणि जनावरांना ही पाणी कसे पाजायचे, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.पाऊस पडला नाहीतर या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी कोठून पाजायचे याचे कसलेही नियोजन पाटबंधारे विभागाने केले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके जातील आणि याला करणीभूत पाटबंधारे विभागच राहील. चाफळ येथील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील फळ्या काढून पाणी सोडून दिले ती चूक सुधारण्यासाठी त्यांनी आता चाफळ धरणातून उत्तरमांड नदीत पाणी सोडावे आणि ऐनभरात आलेल्या आमच्या पिकांना जीवदान द्यावे.याबाबत दखल घेऊन पाणी धरणातून सोडले नाही तर मात्र आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उंब्रज येथून जाणारा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहोत, असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.बंधाऱ्यावरील फळ्या ३१ मे पूर्वी काढाव्यात, असा शासनाचा नियम आहे. या नियमानुसार आम्ही बंधाऱ्यावरील फळ्या काढल्या आहेत; पण पाऊस पडला नाही, यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे आम्ही बुधवारी लघू पाटबंधारे विभाग सातारा यांच्याकडे पाणी सोडावे, अशी लेखीपत्राने मागणी केली आहे. पाणी धरणातून सोडण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्या विभागाकडून ही तातडीने पाणी सोडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.- शामराव नांगरे, शाखा अभियंता, तारळी व उत्तर मांड उपसासिंचन विभाग तारळे