शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संख मध्यम प्रकल्पातून बोर नदीला पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष ...

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाव्दारेे केली आहे.

निवेदनात म्हटले की, संख मध्यम प्रकल्प भरलेला असून, गेल्या दहा वर्षात एकदाही कालव्यात पाणी सोडलेले नाही. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने संख ते उमदीपर्यंत ३२ किलोमीटरचा कालवा पूर्ण केला आहे. १९९८ साली एकदाच पाणी सोडलेले आहे. त्यानंतर एकदाही शाखाधिकारी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडलेले नाही. कालव्यावर त्यांचे नियंत्रण नाही.

कालव्याला पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी या गावांना फायदा होणार आहे. बोर नदीला कोल्हापुरी बंधारे बांधलेले असून, नदीला पाणी सोडल्यास करजगी, बोगी, बेळाडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन कालवे तयार केलेले आहेत. शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधूनही करजगी, बोगी, बालगाव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही. संख तलावातून करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, उमदीपर्यंत कॅनॉलद्वारे व बोर नदीने पाणी सोडल्यास

करजगी, बोर्गी, बालगांव, बेळांडगी, सुसलाद, हळ्ळी बोर या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अपर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.