शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संख मध्यम प्रकल्पातून बोर नदीला पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष ...

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाव्दारेे केली आहे.

निवेदनात म्हटले की, संख मध्यम प्रकल्प भरलेला असून, गेल्या दहा वर्षात एकदाही कालव्यात पाणी सोडलेले नाही. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने संख ते उमदीपर्यंत ३२ किलोमीटरचा कालवा पूर्ण केला आहे. १९९८ साली एकदाच पाणी सोडलेले आहे. त्यानंतर एकदाही शाखाधिकारी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडलेले नाही. कालव्यावर त्यांचे नियंत्रण नाही.

कालव्याला पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी या गावांना फायदा होणार आहे. बोर नदीला कोल्हापुरी बंधारे बांधलेले असून, नदीला पाणी सोडल्यास करजगी, बोगी, बेळाडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन कालवे तयार केलेले आहेत. शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधूनही करजगी, बोगी, बालगाव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही. संख तलावातून करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, उमदीपर्यंत कॅनॉलद्वारे व बोर नदीने पाणी सोडल्यास

करजगी, बोर्गी, बालगांव, बेळांडगी, सुसलाद, हळ्ळी बोर या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अपर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.