शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

संख मध्यम प्रकल्पातून बोर नदीला पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष ...

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाव्दारेे केली आहे.

निवेदनात म्हटले की, संख मध्यम प्रकल्प भरलेला असून, गेल्या दहा वर्षात एकदाही कालव्यात पाणी सोडलेले नाही. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने संख ते उमदीपर्यंत ३२ किलोमीटरचा कालवा पूर्ण केला आहे. १९९८ साली एकदाच पाणी सोडलेले आहे. त्यानंतर एकदाही शाखाधिकारी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडलेले नाही. कालव्यावर त्यांचे नियंत्रण नाही.

कालव्याला पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी या गावांना फायदा होणार आहे. बोर नदीला कोल्हापुरी बंधारे बांधलेले असून, नदीला पाणी सोडल्यास करजगी, बोगी, बेळाडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन कालवे तयार केलेले आहेत. शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधूनही करजगी, बोगी, बालगाव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही. संख तलावातून करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, उमदीपर्यंत कॅनॉलद्वारे व बोर नदीने पाणी सोडल्यास

करजगी, बोर्गी, बालगांव, बेळांडगी, सुसलाद, हळ्ळी बोर या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अपर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.