शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

विट्यात पुन्हा साखळी भेटवस्तू योजना सुरू...

By admin | Updated: January 19, 2015 00:29 IST

फसवणुकीची शक्यता : कंपनीच्या नावात मात्र बदल

दिलीप मोहिते - विटा -सांगली जिल्ह्याची सुवर्णनगरी म्हणून असलेल्या विटा शहरात पुन्हा एकदा साखळी भेटवस्तू योजनेने डोके वर काढले असून, आठवड्याला ठराविक रक्कम भरून घेऊन ग्राहकांच्या माथी कमी दर्जाच्या व गॅरंटी नसलेल्या वस्तू मारून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी ज्यांनी अशा काही योजनांतून शहरासह खानापूर तालुक्यात धुमाकूळ घातला, तेच यात सक्रिय आहेत.तालुक्यात दहा वर्षांपूर्वी सुमन गारमेंट नावाच्या कंपनीने अवघ्या ६० रुपयांत दोन परकर देऊन ड्रॉ काढल्यानंतर विजेत्या ग्राहकांना चार ते पाचअंकी बक्षिसाचे आमिष दाखविले. फक्त एक ते दीड वर्षात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ, जत, मिरज यासह सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात सुमन गारमेंटने चांगलाच हंगामा केला. या मार्केटिंगसाठी संचालकांनी ग्रामीण भागातील एजंटांची नेमणूक करून त्यांनाही दुचाकी, चारचाकी गाड्यांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधींची माया जमा केली.त्यानंतर मात्र या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. त्यातील संचालक स्थानिक खानापूर तालुक्यातीलच रहिवासी होते. परंतु, लोकांची रक्कम परत मिळाली नसल्याने कोट्यवधींचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी विटा शहरात अशाच एका भेटवस्तू साखळी योजनेचा जन्म झाला असून, सर्वसामान्यांना पूर्वी आर्थिक गंडा घातलेल्या काही संचालकांचा या कंपनीत समावेश करण्यात आला असल्याचे बोलले जाते.या कंपनीत आठवड्याला पाचशे ते हजार रुपयांची गुंतवणूक करून आठ दिवसाला ड्रॉ काढण्यात येतो. त्यात विजेत्याला आकर्षक भेटवस्तूचे आमिष दाखविण्यात येते. परंतु, ही भेटवस्तू ग्राहकाने भरलेल्या रकमेपेक्षा कमी दराची व विनागॅरंटी असल्याने फसवणूक होत आहे. तरीही कंपनीचे संचालक व एजंट हे ग्रामीण भागातील लोकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काय आहे योजना...नव्याने सुरू झालेल्या अशाच एका साखळी भेटवस्तू योजनेत कंपनी ग्राहकांकडून आठवड्याला पाचशे ते सातशे रुपये भरून घेऊन ड्रॉ काढत आहे. सहभागी ग्राहकांपैकी अवघ्या एक ते दोन ग्राहकांना भेटवस्तू देऊन उर्वरित ग्राहकांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करण्यास भाग पाडत आहे. परंतु, पुढील आठवड्यापर्यंत ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ होऊन मागील ग्राहकांना पुन्हा पाचशे ते सातशे रुपये भरणे भाग पडत आहे. त्यामुळे योजनेद्वारे मिळणारी भेटवस्तू ही विनागॅरंटी व दर्जाहीन असल्याची चर्चा आहे.विटा शहरात विनापरवाना साखळी भेटवस्तू योजना सुरू करून लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी व त्या कंपनीच्या संचालकांची गय केली जाणार नाही. एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास किंवा फसवणुकीची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यास तातडीने संचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- अनिल पोवार, पोलीस निरीक्षक, विटा