शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: May 9, 2017 23:43 IST

प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील तीस वर्षे झालेल्या कासेगावच्या मूळ व सुधारितसह कुंडल, तुंग, येळावी अशा पाच प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठ्याच्या १०० योजनांना पुनरूज्जीवन देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व प्रस्ताव तातडीने पाठवून देण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्ह्यातील प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना खूप जुन्या आहेत. यामुळे पाण्याची गळती मोठ्याप्रमाणात असून, पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, त्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री खोत यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात खोत, देशमुख आणि पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या वस्तुस्थितीची माहिती खोत यांनी घेतली. ३० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी शासन तातडीने निधी देईल. शिवाय ३० वर्षे झालेल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचेही प्रस्ताव सादर करण्याची सूचना खोत यांनी दिली. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव मूळ व पेठ, विठ्ठलवाडी, जांभुळवाडीसह आठ गावांसाठीची सुधारित योजना, पलूस तालुक्यातील कुंडल, तासगाव तालुक्यातील येळावी, मिरज तालुक्यातील तुंग प्रादेशिक योजना आणि १०० स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.पलूसमध्ये रात्रीपासून पाणी पुरवठा सुरूपलूस : कुंडल प्रादेशिक योजना मंगळवारी रात्री उशिरा सुरू झाली असून, एक-दोन दिवसात संपूर्ण पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पलूस तालुक्यातील जवळपास निम्म्या गावांची तहान भागवणाऱ्या कुंडल नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा गेल्या मंगळवारी वीज बिल थकबाकीसाठी महावितरणने पाचव्यांदा बंद केल्याने, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांत मागील पाच-सहा दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे वृत वेळोवेळी प्रसिध्द केल्याने, याची दखल घेत, दोनच दिवसात सत्तावीस लाख सहासष्ट हजार रूपये जमा केले. पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ म्हणाले की, येथून पुढे ज्या ग्रामपंचायती नियमित व मागील थकबाकीपोटी पाणीपट्टी वेळेवर भरतील, त्यांनाच पाणी पुरवठा केला जाणार आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी कुंडल योजनेविषयी आवाज उठविल्याने आम्हाला मदतच झाल्याचे सांगून त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.टंचाई लक्षात घेऊन वीज जोडणी करणार : खोतंंपाणीटंचाई लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. थकीत वीज बिल भरणे नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी १५ समान हप्ते करण्याचा विचार आहे. ग्रामपंचायतीने पहिला हप्ता भरल्यानंतर लगेच वीज जोडणी करणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.