शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: May 9, 2017 23:43 IST

प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील तीस वर्षे झालेल्या कासेगावच्या मूळ व सुधारितसह कुंडल, तुंग, येळावी अशा पाच प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठ्याच्या १०० योजनांना पुनरूज्जीवन देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व प्रस्ताव तातडीने पाठवून देण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्ह्यातील प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना खूप जुन्या आहेत. यामुळे पाण्याची गळती मोठ्याप्रमाणात असून, पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, त्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री खोत यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात खोत, देशमुख आणि पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या वस्तुस्थितीची माहिती खोत यांनी घेतली. ३० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी शासन तातडीने निधी देईल. शिवाय ३० वर्षे झालेल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचेही प्रस्ताव सादर करण्याची सूचना खोत यांनी दिली. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव मूळ व पेठ, विठ्ठलवाडी, जांभुळवाडीसह आठ गावांसाठीची सुधारित योजना, पलूस तालुक्यातील कुंडल, तासगाव तालुक्यातील येळावी, मिरज तालुक्यातील तुंग प्रादेशिक योजना आणि १०० स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.पलूसमध्ये रात्रीपासून पाणी पुरवठा सुरूपलूस : कुंडल प्रादेशिक योजना मंगळवारी रात्री उशिरा सुरू झाली असून, एक-दोन दिवसात संपूर्ण पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पलूस तालुक्यातील जवळपास निम्म्या गावांची तहान भागवणाऱ्या कुंडल नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा गेल्या मंगळवारी वीज बिल थकबाकीसाठी महावितरणने पाचव्यांदा बंद केल्याने, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांत मागील पाच-सहा दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे वृत वेळोवेळी प्रसिध्द केल्याने, याची दखल घेत, दोनच दिवसात सत्तावीस लाख सहासष्ट हजार रूपये जमा केले. पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ म्हणाले की, येथून पुढे ज्या ग्रामपंचायती नियमित व मागील थकबाकीपोटी पाणीपट्टी वेळेवर भरतील, त्यांनाच पाणी पुरवठा केला जाणार आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी कुंडल योजनेविषयी आवाज उठविल्याने आम्हाला मदतच झाल्याचे सांगून त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.टंचाई लक्षात घेऊन वीज जोडणी करणार : खोतंंपाणीटंचाई लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. थकीत वीज बिल भरणे नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी १५ समान हप्ते करण्याचा विचार आहे. ग्रामपंचायतीने पहिला हप्ता भरल्यानंतर लगेच वीज जोडणी करणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.