शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

दहावी, बारावीची परीक्षा फी विद्यार्थांना परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

प्रतापसिंह चोपदार यांनी प्रा. रवींद्र फडके यांच्या मदतीने मिरजेतील वकील पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात जनहित ...

प्रतापसिंह चोपदार यांनी प्रा. रवींद्र फडके यांच्या मदतीने मिरजेतील वकील पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. राज्यात कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असूनही पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पदरमोड करत आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा शुल्काचे चारशे ते पाचशे रुपये परत मिळणे हे त्यांच्यासाठी दिलासादायक असेल. शिवाय परीक्षा घेतली नसताना त्याविषयीचे शुल्क परत करणे हे बोर्डाचे कर्तव्य असून ते परत मिळणे हा पालकांचा मूलभूत हक्क असल्याचा दावा चोपदार यांनी याचिकेत केला होता.

सरकारी वकिलांनी दहावी-बारावीची चारशे किंवा पाचशे रुपये परीक्षा फी ही किरकोळ रक्कम असल्याचे सांगितले. मात्र याबाबत सांगलीतील विनायक गानमोटे यांनी पालक म्हणून दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने हे सरकारी पक्षाचे म्हणणे फेटाळले.

विद्यार्थ्यानुसार ही रक्कम किरकोळ वाटत असली तरी, कोरोना संकटाने आर्थिक अडचणीत आलेल्या विद्यार्थी व पालकांची ही संख्या मोठी आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली सुमारे ८० कोटी रुपये व बारावीच्या विद्यार्थ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांची फी बोर्डाने परत देण्याबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने माध्यमिक शिक्षण विभागाला दिला.