शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

रिफाईंड तेलामुळे वाढते चरबी, घाणा तेलाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आपल्या जेवणात रिफाइंड तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आपल्या जेवणात रिफाइंड तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे नागरिकांमध्ये याबाबत वाढलेली सतर्कता पाहून शहर व परिसरात सध्या लाकडी व स्टिलच्या घाण्यातील तेल उत्पादन वाढले आहे.

तेल रिफाइंड करताना केमिकलचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेजिस् तयार होतात. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. तेल रिफाइंड करताना सुरुवातीला ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाइंड करताना तेल अनेकवेळा उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात.

चौकट

रिफाइंड तेल घातक का?

- अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही.

- सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन अशा प्रकारची केमिकल्स वापरली जातात.

- रिफाइंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकाही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहात नाही.

- रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात.

- रिफाइंड तेलामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात.

चौकट

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

चौकट

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वांधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

कोट

घाण्याच्या तेलामध्ये तेलबियांमधील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात. याशिवाय त्याच्या तळाशी राहिलेला चोथा म्हणजेच फायबर हे शरीराला उपयुक्त असते. अशा प्रकारच्या तेलातून शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात, जे रिफाईंड तेलातून मिळत नाहीत.

- शार्दुली तेरवाडकर, आहारतज्ज्ञ, सांगली