शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

रिफाईंड तेलामुळे वाढते चरबी, घाणा तेलाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आपल्या जेवणात रिफाइंड तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आपल्या जेवणात रिफाइंड तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे नागरिकांमध्ये याबाबत वाढलेली सतर्कता पाहून शहर व परिसरात सध्या लाकडी व स्टिलच्या घाण्यातील तेल उत्पादन वाढले आहे.

तेल रिफाइंड करताना केमिकलचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेजिस् तयार होतात. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. तेल रिफाइंड करताना सुरुवातीला ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाइंड करताना तेल अनेकवेळा उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात.

चौकट

रिफाइंड तेल घातक का?

- अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही.

- सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन अशा प्रकारची केमिकल्स वापरली जातात.

- रिफाइंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकाही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहात नाही.

- रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात.

- रिफाइंड तेलामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात.

चौकट

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

चौकट

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वांधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

कोट

घाण्याच्या तेलामध्ये तेलबियांमधील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात. याशिवाय त्याच्या तळाशी राहिलेला चोथा म्हणजेच फायबर हे शरीराला उपयुक्त असते. अशा प्रकारच्या तेलातून शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात, जे रिफाईंड तेलातून मिळत नाहीत.

- शार्दुली तेरवाडकर, आहारतज्ज्ञ, सांगली