शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

पाण्याचा पुनर्वापर : बचतीबरोबर हवा जलसंधारणावर भर !

By admin | Updated: July 26, 2014 00:31 IST

लोकमत इनिशिएटिव्ह

सांगली : जिल्ह्याला वरदान ठरलेल्या चांदोली (वारणा) धरणाने जून महिन्यात प्रथमच तळ गाठला होता. शेतीच्या पाणी वापरावर बंदी घालण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि ते साठवले नाही, तर भविष्यात यावर्षीपेक्षाही भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय सोडण्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही गावांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यातूनच प्रेरणा घेण्याची गरज आहे. काही गावे दुष्काळातही ‘पाणीदार’ होती. या गावांनी केलेल्या जलसंधारणातील कामांचा आदर्श आपणही घेण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात चांदोली (वारणा) हे एकमेव धरण आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असले तरी, कृष्णा नदीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या ५० टक्के भागाला त्याचा फायदा होतो. मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे चांदोली आणि कोयना या दोन्ही धरणांनी तळ गाठला होता. कोयना धरण प्रथमच कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता होती. पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण झाले की, प्रशासन, राज्यकर्ते आणि आपणही निसर्गाच्या लहरीपणाकडे बोट दाखवून हात वर करण्यात धन्यता मानतो. मात्र, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी माझ्या गावाने काही तरी केले पाहिजे, याची प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गार्डी, सांगोले, रेणावी, बेणापूर, कडेगाव तालुक्यातील शाळगाव, वांगी या गावांनी जलसंधारणाचे आदर्श प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे दुष्काळातही या गावांना पाणीटंचाई जाणवली नाही. या ‘पाणीदार’ गावांनी पाणीटंचाईवर कशी मात केली, याची माहिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. पाणी बचतीबाबत अनेकवेळा चर्चा होते, विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरु झाला की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे.सामूहिक जबाबदारी-सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा-येत्या पावसाळ्यात मोठमोठ्या चरी घेऊन पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्या-जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे-नैसर्गिक जलस्रोत व टेकांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून आपली ओळख जपावैयक्तिक जबाबदारी-ग्रामस्थांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा-अंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे-नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी-शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देताना अतिरिक्त पाणी देऊ नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावेअंघोळ -बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर ४शॉवरखाली : १०० लिटरदाढी-नळ सोडून दाढी केल्यास : १० लिटर-मग घेऊन : १ लिटरब्रश-नळ सोडून केल्यास : १० लिटर-मग घेऊन : १ लिटरकपडे-नळाखाली : ११६ लिटर-बादलीचा वापर : ३६ लिटरमोटार४पाईप वापरल्यास : १०० लिटर-बादलीचा वापर : १८ लिटरहात धुण्यासाठी-नळाखाली : १० लिटर-मग घेऊन : अर्धा लिटरशौचविधी-फ्लश केल्यास : २० लिटर-बादलीचा वापर : ६ लिटरग्रामस्थांनो, लक्षात ठेवाखरं तर आपण पाण्याची काटकसर करत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या अमर्याद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.