शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साडेतीन कोटींची वसुली होणार

By admin | Updated: July 3, 2016 00:25 IST

रविकांत आडसूळ : दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी करणार

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील १८० प्रकरणांमध्ये ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ३९१ प्रकरणांमध्ये ५ कोटी ३९ लाख २९ हजार ५२८ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला होता. हा घोटाळा १९८९-९० ते २००६-०७ या कालावधितील आहे. बहुतांशी गैरव्यवहार हा ग्रामसेवकांकडून झाला असून, काहीजण सेवानिवृत्तही झाले आहेत. याप्रकरणी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडून झालेल्या कारवाईमध्ये २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामधील १ कोटी ८८ लाख २ हजार ९२२ रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपये वसूल होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. याप्रकरणी पंचायत राज समिती (पीआरसी) समितीकडूनही विचारणा झाली आहे. यामुळे दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मोहीम अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार अपहाराची रक्कम न भरणाऱ्या ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ती वसूल करण्यात येणार आहे. काही ग्रामसेवक मृत झाले असून, त्यांच्या नातेवाईकांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या नोटिसा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवार, दि. ४ रोजी देण्यात येणार आहेत. या नोटिसीला उत्तर आल्यानंतर दोषी ग्रामसेवकांवर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहे. (प्रतिनिधी) एकाच ग्रामसेवकाचा : अनेक ठिकाणी अपहार जिल्ह्यातील काही ग्रामसेवक असे आहेत की, त्यांनी कार्यरत ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर दुसरीकडे बदली करून जायचे, अशी भूमिका बजावली आहे. यामुळे साडेतीन कोटी रुपये घोटाळ्यातील रकमेपैकी मोजक्याच ग्रामसेवकांकडे प्रत्येकी दहा ते वीस लाख रुपये आहेत. शिवाय, हे घोटाळेबहाद्दर ग्रामसेवक राजकर्त्यांच्याही जवळचे आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाईही होत नाही.