शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साडेतीन कोटींची वसुली होणार

By admin | Updated: July 3, 2016 00:25 IST

रविकांत आडसूळ : दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी करणार

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील १८० प्रकरणांमध्ये ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ३९१ प्रकरणांमध्ये ५ कोटी ३९ लाख २९ हजार ५२८ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला होता. हा घोटाळा १९८९-९० ते २००६-०७ या कालावधितील आहे. बहुतांशी गैरव्यवहार हा ग्रामसेवकांकडून झाला असून, काहीजण सेवानिवृत्तही झाले आहेत. याप्रकरणी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडून झालेल्या कारवाईमध्ये २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामधील १ कोटी ८८ लाख २ हजार ९२२ रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपये वसूल होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. याप्रकरणी पंचायत राज समिती (पीआरसी) समितीकडूनही विचारणा झाली आहे. यामुळे दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मोहीम अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार अपहाराची रक्कम न भरणाऱ्या ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ती वसूल करण्यात येणार आहे. काही ग्रामसेवक मृत झाले असून, त्यांच्या नातेवाईकांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या नोटिसा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवार, दि. ४ रोजी देण्यात येणार आहेत. या नोटिसीला उत्तर आल्यानंतर दोषी ग्रामसेवकांवर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहे. (प्रतिनिधी) एकाच ग्रामसेवकाचा : अनेक ठिकाणी अपहार जिल्ह्यातील काही ग्रामसेवक असे आहेत की, त्यांनी कार्यरत ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर दुसरीकडे बदली करून जायचे, अशी भूमिका बजावली आहे. यामुळे साडेतीन कोटी रुपये घोटाळ्यातील रकमेपैकी मोजक्याच ग्रामसेवकांकडे प्रत्येकी दहा ते वीस लाख रुपये आहेत. शिवाय, हे घोटाळेबहाद्दर ग्रामसेवक राजकर्त्यांच्याही जवळचे आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाईही होत नाही.