शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:46 IST

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी ...

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी धरणाच्या प्रशासनाविरोधात याचिका दाखल करावी, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय, संघटनांच्या बैठकीत करण्यात आली.महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने महापुराच्या उपाययोजना व पूरनियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेत सर्वपक्षीय संघटनांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त राजेंद्र तेली, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार, नगरसेविका स्वाती शिंदे, योगेंद्र थोरात, जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अनारकली कुरणे, विजय घाडगे, अमर पडळकर आदी उपस्थित होते.माजी अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर धरण, तेरवाड धरण, म्हैसाळ योजनेचे बॅकवॉटर यामुळे सांगलीत महापूर येतो. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील. धरणात पाणीसाठा किती असावा, याचाही निकष आहे. प्रत्येकवर्षी अलमट्टी असो वा कोयना धरण, पाटबंधारे विभागाच्या नियमावलीनुसार महापूर न येण्यासाठी एक आॅगस्टपर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असता कामा नये. एक सप्टेंबरपर्यंत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असू नये. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.सतीश साखळकर म्हणाले, पूरनियंत्रण व त्यावर उपाययोजना, मदतीसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतही डिझास्टर असोसिएशन स्थापन करावी. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ आदींची समिती करावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महिला, मुलींना प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.शिवाजीराव ओऊळकर यांनी, महापुरावर सरदार पाटील यांनी पीएच.डी. केली आहे, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना केली. शिकलगार म्हणाले, महापुराचे किंवा पावसाचे पाणी शामरावनगरात शिरल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधीतून अडीच कोटी रुपयांची गटार बांधण्यात आली. पण ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने फटका बसत आहे.शैलेश पवार म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्ता पाण्याखाली जातो. तो जाऊ नये यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारी करून सर्व पाणी अंकलीमार्गे नदीकडे सोडण्यासाठी बांधीव गटारींचा प्रस्ताव होता. तो अमलात आणावा. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, कोयना धरणातून विसर्गामुळे महापूर येतो. त्याऐवजी थेट कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे दुष्काळी भागाला द्यावे. यावेळी जगन्नाथ ठोकळे, मयूर घोडके, अश्रफ वांकर, आसिफ बावा यांनीही सूचना मांडल्या.अखेर संगीता खोत यांनी, महापूर नियंत्रणाबाबत उपाययोजना, अलमट्टी धरण, कोयना धरणाबाबत सविस्तर शासनाला अहवाल दिला जाईल. महापुरासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापून यासाठी शासनावर दबाव निर्माण करू आणि शहर विकासाचा लढा उभारू, असे आवाहन केले.