शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:46 IST

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी ...

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी धरणाच्या प्रशासनाविरोधात याचिका दाखल करावी, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय, संघटनांच्या बैठकीत करण्यात आली.महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने महापुराच्या उपाययोजना व पूरनियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेत सर्वपक्षीय संघटनांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त राजेंद्र तेली, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार, नगरसेविका स्वाती शिंदे, योगेंद्र थोरात, जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अनारकली कुरणे, विजय घाडगे, अमर पडळकर आदी उपस्थित होते.माजी अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर धरण, तेरवाड धरण, म्हैसाळ योजनेचे बॅकवॉटर यामुळे सांगलीत महापूर येतो. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील. धरणात पाणीसाठा किती असावा, याचाही निकष आहे. प्रत्येकवर्षी अलमट्टी असो वा कोयना धरण, पाटबंधारे विभागाच्या नियमावलीनुसार महापूर न येण्यासाठी एक आॅगस्टपर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असता कामा नये. एक सप्टेंबरपर्यंत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असू नये. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.सतीश साखळकर म्हणाले, पूरनियंत्रण व त्यावर उपाययोजना, मदतीसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतही डिझास्टर असोसिएशन स्थापन करावी. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ आदींची समिती करावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महिला, मुलींना प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.शिवाजीराव ओऊळकर यांनी, महापुरावर सरदार पाटील यांनी पीएच.डी. केली आहे, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना केली. शिकलगार म्हणाले, महापुराचे किंवा पावसाचे पाणी शामरावनगरात शिरल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधीतून अडीच कोटी रुपयांची गटार बांधण्यात आली. पण ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने फटका बसत आहे.शैलेश पवार म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्ता पाण्याखाली जातो. तो जाऊ नये यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारी करून सर्व पाणी अंकलीमार्गे नदीकडे सोडण्यासाठी बांधीव गटारींचा प्रस्ताव होता. तो अमलात आणावा. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, कोयना धरणातून विसर्गामुळे महापूर येतो. त्याऐवजी थेट कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे दुष्काळी भागाला द्यावे. यावेळी जगन्नाथ ठोकळे, मयूर घोडके, अश्रफ वांकर, आसिफ बावा यांनीही सूचना मांडल्या.अखेर संगीता खोत यांनी, महापूर नियंत्रणाबाबत उपाययोजना, अलमट्टी धरण, कोयना धरणाबाबत सविस्तर शासनाला अहवाल दिला जाईल. महापुरासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापून यासाठी शासनावर दबाव निर्माण करू आणि शहर विकासाचा लढा उभारू, असे आवाहन केले.