शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १३०९ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात १३०९ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर जिल्ह्यातील २८ जणांसह ...

सांगली : जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात १३०९ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर जिल्ह्यातील २८ जणांसह परजिल्ह्यातील १० अशा ३८ जणांचा मृत्यू झाला. ५५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्यावर्षी जिल्हा, परजिल्हा मिळून १२७४ जणांची सर्वाधिक नोंद झाली होती. शुक्रवारी ही संख्या पार करत १३०९ कोरोनाबाधित आढळून आले. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून तेथे तब्बल १८९ बाधित आढळले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक सात जण खानापूर तालुक्यातील असून वाळवा ६, मिरज तालुका ४, महापालिका क्षेत्र, आटपाडी, तासगाव आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी दोन तर पलूस, कडेगाव आणि जत तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात १९० तर आटपाडी, कडेगाव, मिरज, शिराळा तालुक्यात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

प्रशासनाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत २४०६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ७२६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड अँटिजनच्या २९५२ जणांच्या नमुन्यांची चाचणी केली त्यात ६४४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ५०९ वर पोहोचली आहे. त्यातील १५९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात १४४३ जण ऑक्सिजनवर तर १५२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ५८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ६६८६६

उपचार घेत असलेले १०५०९

कोरोनामुक्त झालेले ५४३१९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २०३८

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ९५

मिरज ९५

आटपाडी १८९

मिरज तालुका १७६

कडेगाव १५४

वाळवा १३८

तासगाव ९१

कवठेमहांकाळ ८९

खानापूर ८०

पलूस ७५

शिराळा ७२

जत ५५

चौकट

लस संपली!

कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर दुपारनंतर लसीकरण ठप्प झाले. महापालिकेच्या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांवर दुपारीच लस संपली. दिवसभरात ६५१७ जणांना लस देण्यात आली. शनिवारी संध्याकाळी लस येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (सविस्तर वृत्त : पान २ वर)