शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

रयत, संस्थापक पॅनेलवर आत्मचिंतनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या प्रचाराची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या प्रचाराची धुरा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांभाळली, तर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात स्वतः अविनाश मोहिते पुढे होते. यामुळे ही तिरंगी निवडणूक रंगतदार झाली. ‘कृष्णा’तील सत्ताधारी सहकार पॅनेलविरुद्ध लढताना रयत पॅनल आणि संस्थापक पॅनेलची आघाडी होणे अपेक्षित होते. मात्र येथे सभासद मतदारांच्या लोकभावनेचा विचार न करता त्यांना गृहीत धरणाऱ्या सल्लागारांचा आविर्भाव नडला आणि बिघाडी झाली. यामुळे रयत आणि संस्थापक या दोन्ही पॅनेलची मागील निवडणुकीपेक्षा जास्तच पीछेहाट झाली.

कृष्णा कारखान्याच्या सत्तेची सूत्रे पुन्हा सहकार पॅनेलच्या हातात गेली आहेत; पण या निवडणुकीने विरोधी बाजूला अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह कृष्णेच्या राजकारणात विश्वजित कदम नावाचा मोहरा दिला आहे. वास्तविक रयत आणि संस्थापक पॅनल एकत्र येऊन लढले असते तर निवडणूक अटीतटीची झाली असती. मात्र आघाडी न झाल्यामुळे सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारली.

आता डॉ. सुरेश भोसले पुन्हा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष होतील; पण तेथील राजकारणातील विरोधी बाजूने अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह डॉ. विश्वजित कदम यांनाही लक्ष घालावे लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कृष्णेच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या विश्वजित पर्वाची सुरुवात झाली आहे. विश्वजित कदम हाच एक चेहरा यापुढील कालावधीतही अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह विरोधकांची मोट बांधून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करू शकतो. याचीही जाणीव सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे.

चौकट

त्यांच्या वाट्याला पुन्हा संघर्ष

सुरुवातीला अटीतटीची वाटणारी कृष्णेची निवडणूक एकतर्फी झाली असली तरी विश्वजित कदम यांच्या प्रचारसभांमुळे या निवडणुकीला रंग आला. मात्र तरीही रयत पॅनेलची घसरगुंडी थांबविण्यात त्यांना यश आले नाही. याशिवाय अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेललाही मागील निवडणुकीइतकी कामगिरी जमली नाही. कृष्णा कारखान्याचे राजकारण हे अनेक वर्षे दोन मोहिते आणि भोसले यांच्याचभोवती फिरत राहिले. हे सत्य असले तरी आता दोन्ही मोहिते पुन्हा सत्तेच्या बाहेर आहेत. यामुळे त्यांच्या वाट्याला पुन्हा संघर्षच आला आहे.