शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

संवादासाठी त्यांनी केला टीव्हीला रामराम

By admin | Updated: May 26, 2014 01:17 IST

अनोखे पाऊल : पैसा असूनही सांगलीच्या तीन कुटुंबांनी नाकारला ‘इडियट बॉक्स’;

नरेंद्र रानडे, सांगली : माणसाच्या जीवनावश्यक गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला तर अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आता टीव्हीचे नावही बहुतांश लोक घेतील. या इडियट बॉक्सचे वेड वाढत असतानाच घरातील लोकांचा एकमेकांशी असलेला संवाद कमी होत आहे. या गोष्टीची जाणीव झालेल्या सांगलीच्या तीन कुटुंबांनी टीव्हीला चक्क रामराम ठोकला. पेशाने वकील, शिक्षक व विमा सल्लागार असलेल्या सांगलीतील तिघांनी टीव्हीशिवाय छान जगता येऊ शकते, हे दाखवून दिले आहे. टीव्ही आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. दैनंदिन घडामोडींशी संलग्न राहतानाच मनोरंजनाचे मुख्य साधन म्हणून याकडे पाहिले जाते. श्रीमंतांचा राजवाडा असो की दारिद्र्याशी संघर्ष करणारी झोपडी, अशा प्रत्येक ठिकाणी टीव्हीने बस्तान बसविले आहे. अशा परिस्थितीत पैसा असूनही कोणी टीव्हीपासून दूर राहू शकतो, ही गोष्ट कोणालाही पटणार नाही. पण ही गोष्ट सांगलीतील तीन कुटुंबांनी शक्य करून दाखविली आहे. विश्रामबाग गव्हर्मेंट कॉलनीत राहणारे अ‍ॅड. आनंद देशपांडे, विश्रामबाग परिसरातच राहणारे शिक्षक व्ही. एस. शिंदे आणि शंभरफुटी रस्त्यावरील अरिहंत कॉलनीत राहणारे विमा सल्लागार विनायक बुटाले यांनी टीव्हीमुक्त जीवनाचा पायंडा पाडला आहे. दैनंदिन घडामोडींसाठी ते वृत्तपत्राचा आधार घेतात, तर करमणुकीसाठी चित्रपटगृहांसह नाट्यगृहाला ते पसंती देतात. टीव्ही नव्हता तेव्हा प्रत्येकजण आयुष्याचे जीवनगाणे उत्तमप्रकारे गातच होता. घरातीलच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही कित्येकजण नावानिशी ओळखत होते. घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्याशी भरभरुन बोलायला घरातील प्रत्येकजण उत्सुक असायचा. साहजिकच संवाद तुटक नव्हे, तर मनमोकळेपणाने व्हायचा. मुले सायंकाळी मैदानात खेळायला जायची यामुळे ती बेढब नव्हती, तर चपळ होती. लहानपणी कोणालाही चष्मा लागलेला दिसायचा नाही. परंतु सध्या बरोबर याच्या उलट परिस्थिती आहे. या सर्व गोष्टींची कल्पना आल्यानंतर त्याचे गांभीर्यही या तिन्ही कुटुंबांनी ओळखले आणि त्यांनी टीव्हीचा त्याग केला.