शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

उसाचा दर ठरेना, गुळाला दर मिळेना!

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

शेतकरी हवालदिल : आंदोलने शमल्याने गळीत हंगाम जोमात

पुनवत : प्रतिवर्षी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान अनेक शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी केली जाणारी आंदोलने यंदा शमली आहेत. परिणामी यंदाच्या हंगामात उसदराची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गळीत हंगामास जवळपास महिना उलटून गेला, तरी उसाचा दर ठरलेला नाही, तर दुसरीकडे वारणा पट्ट्यात चालू असलेल्या गुऱ्हाळघरातील गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कात्रीत सापडला असून, ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अनेक शेतकऱ्यांनी उसावर कोयता चालवला आहे.सध्या जिल्ह्यात साखर कारखाने जोमात सुरू झाले आहेत, तर शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरांमध्ये चिमण्याही पेटल्या आहेत. साखर आणि गुळाचे उत्पादन सुरू आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हवा असायची. ऊसदरासाठी हे दोन्ही घटक रस्त्यावर उतरायचे, मात्र यंदा साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटला, तरी उसाचा अधिकृत दर ठरलेला नाही. शेतकरी उसदराच्या प्रतीक्षेत असताना काँग्रेस सरकारच्या काळात भांडणाऱ्या शेतकरी संघटना यावर्षी कुठे गेल्या, असा सवालही शेतकरी करीत आहेत.दुसरीकडे वारणा पट्ट्यातील गुळाला प्रतिक्विंटल तीन हजाराच्या आसपासच दर मिळत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत. शेतकऱ्याच्या एका आदणाला सुमारे अडीच क्विंटल गूळ पडला तर त्या गुळाचे ९ ते १० हजार रुपये होतात. त्यातून गुऱ्हाळभाडे २०००, वाहतूक, हमाली, तोलाई, दलाली, खते व मशागतीचा खर्च वजा केल्यास एका आदणाला ३००० रुपयेच मिळतात. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. (वार्ताहर)गुळाला अच्छे दिन येणार?एकीकडे ऊसदर अद्याप जाहीर झाला नसल्याने दुसरीकडे गुळालाही हा दर मिळेनासा झाला आहे. उसाचा दर निश्चित झाल्यानंतर गुळाला ‘अच्छे दिन’ यायला मदत होणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सध्या शेत मोकळे करण्यासाठी कोयता चालवला आहे.