शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उसाचा दर ठरेना, गुळाला दर मिळेना!

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

शेतकरी हवालदिल : आंदोलने शमल्याने गळीत हंगाम जोमात

पुनवत : प्रतिवर्षी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान अनेक शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी केली जाणारी आंदोलने यंदा शमली आहेत. परिणामी यंदाच्या हंगामात उसदराची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गळीत हंगामास जवळपास महिना उलटून गेला, तरी उसाचा दर ठरलेला नाही, तर दुसरीकडे वारणा पट्ट्यात चालू असलेल्या गुऱ्हाळघरातील गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कात्रीत सापडला असून, ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अनेक शेतकऱ्यांनी उसावर कोयता चालवला आहे.सध्या जिल्ह्यात साखर कारखाने जोमात सुरू झाले आहेत, तर शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरांमध्ये चिमण्याही पेटल्या आहेत. साखर आणि गुळाचे उत्पादन सुरू आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हवा असायची. ऊसदरासाठी हे दोन्ही घटक रस्त्यावर उतरायचे, मात्र यंदा साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटला, तरी उसाचा अधिकृत दर ठरलेला नाही. शेतकरी उसदराच्या प्रतीक्षेत असताना काँग्रेस सरकारच्या काळात भांडणाऱ्या शेतकरी संघटना यावर्षी कुठे गेल्या, असा सवालही शेतकरी करीत आहेत.दुसरीकडे वारणा पट्ट्यातील गुळाला प्रतिक्विंटल तीन हजाराच्या आसपासच दर मिळत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत. शेतकऱ्याच्या एका आदणाला सुमारे अडीच क्विंटल गूळ पडला तर त्या गुळाचे ९ ते १० हजार रुपये होतात. त्यातून गुऱ्हाळभाडे २०००, वाहतूक, हमाली, तोलाई, दलाली, खते व मशागतीचा खर्च वजा केल्यास एका आदणाला ३००० रुपयेच मिळतात. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. (वार्ताहर)गुळाला अच्छे दिन येणार?एकीकडे ऊसदर अद्याप जाहीर झाला नसल्याने दुसरीकडे गुळालाही हा दर मिळेनासा झाला आहे. उसाचा दर निश्चित झाल्यानंतर गुळाला ‘अच्छे दिन’ यायला मदत होणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सध्या शेत मोकळे करण्यासाठी कोयता चालवला आहे.