शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आरवडेत भाजपविरोधात राष्ट्रवादी--आबा-काका गटात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:15 IST

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे खुल्या सरपंचपदामुळे चुरस; राजकीय उलथापालथीने समीकरणे बदललीदोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे

संजयकुमार चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कमांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजअखेर गावातील दोन स्थानिक गटांत संघर्ष आहे. त्यांच्यात कधीच समझोता झालेला नाही. आताही मोठा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

आरवडेमध्ये चार प्रभाग असून, ३३०० मतदार आहेत व ११ सदस्य व १ सरपंच अशी १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावाची निवडणूक लक्षवेधी असते. हे संवेदनशील गाव आहे. गावात आर. आर. पाटील आबा विरुद्ध खासदार संजयकाका पाटील या दोन गटांचा टोकाचा संघर्ष आहे. परंतु मागील दोन वर्षात राजकारणात उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे खासदार गटाची सत्ता होती; परंतु या गटातील प्रमुख युवराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकसभेपूर्वी आर. आर. पाटील गटात प्रवेश केला. त्यामुळे खासदार गटाची ग्रामपंचायतीवरील सत्ता संपुष्टात आली.

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या संभाजी मस्के, संदीप चव्हाण, संतोष पाटील, बालाजी पाटील, सुदाम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे. खासदार पाटील यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतल्याने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यांनी यासाठी ताकद दिली आहे.

ग्रामपंचायतीतील विरोधी गटाचे नेतृत्व संभाजी मस्के, राजू साहेब, बाळासाहेब शिंदे, संतोष पाटील करत आहेत. त्यांनी यावेळी सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे व सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार केला आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील व प्रकाश पाटील करत आहेत. सत्ताधारी गटातील बरीच नाराज मंडळी तसेच खासदार निष्ठावंतांनी विरोधी गटात प्रवेश केला असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता आहे.दोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही गटाची डोकेदुखी झाली आहे. प्रभागवार बैठका सुरू आहेत.निवडणुकीची चर्चा : जोरातविरोधक मागील २० वर्षांत ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन जनतेपुढे जात आहेत, तर सत्ताधारी केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीची चर्चा परिसरात जोरात होत आहे.