शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आरवडेत भाजपविरोधात राष्ट्रवादी--आबा-काका गटात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:15 IST

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे खुल्या सरपंचपदामुळे चुरस; राजकीय उलथापालथीने समीकरणे बदललीदोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे

संजयकुमार चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कमांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजअखेर गावातील दोन स्थानिक गटांत संघर्ष आहे. त्यांच्यात कधीच समझोता झालेला नाही. आताही मोठा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

आरवडेमध्ये चार प्रभाग असून, ३३०० मतदार आहेत व ११ सदस्य व १ सरपंच अशी १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावाची निवडणूक लक्षवेधी असते. हे संवेदनशील गाव आहे. गावात आर. आर. पाटील आबा विरुद्ध खासदार संजयकाका पाटील या दोन गटांचा टोकाचा संघर्ष आहे. परंतु मागील दोन वर्षात राजकारणात उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे खासदार गटाची सत्ता होती; परंतु या गटातील प्रमुख युवराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकसभेपूर्वी आर. आर. पाटील गटात प्रवेश केला. त्यामुळे खासदार गटाची ग्रामपंचायतीवरील सत्ता संपुष्टात आली.

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या संभाजी मस्के, संदीप चव्हाण, संतोष पाटील, बालाजी पाटील, सुदाम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे. खासदार पाटील यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतल्याने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यांनी यासाठी ताकद दिली आहे.

ग्रामपंचायतीतील विरोधी गटाचे नेतृत्व संभाजी मस्के, राजू साहेब, बाळासाहेब शिंदे, संतोष पाटील करत आहेत. त्यांनी यावेळी सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे व सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार केला आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील व प्रकाश पाटील करत आहेत. सत्ताधारी गटातील बरीच नाराज मंडळी तसेच खासदार निष्ठावंतांनी विरोधी गटात प्रवेश केला असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता आहे.दोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही गटाची डोकेदुखी झाली आहे. प्रभागवार बैठका सुरू आहेत.निवडणुकीची चर्चा : जोरातविरोधक मागील २० वर्षांत ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन जनतेपुढे जात आहेत, तर सत्ताधारी केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीची चर्चा परिसरात जोरात होत आहे.