शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

रेशनिंगच्या हातचलाखीत अधिकारी वाटेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात आॅल महाराष्टÑ फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. बाबर म्हणाले की, रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५0 हजार मानधन देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. येत्या १ सप्टेंबरपर्यंत महामंडळ स्थापन करून मानधन सुरू केले नाही, तर आधार नोेंदणीसाठी दुकानदारांना दिलेले पॉझ यंत्र आम्ही शासनाला परत करू. दुकानदारांच्या समस्या समजून घेण्यापेक्षा त्यांच्याकडे अप्रामाणिक म्हणून पाहिले जाते. शासनाची ही दृष्टी असली तरी, या गोष्टीस शासकीय अधिकारीच कारणीभूत आहेत.गेल्या काही वर्षांपासून रेशनिंग व्यावसायात हातचलाखीचा प्रकार सुरू असल्याची गोष्ट खरी आहे. सरकारी अधिकारीच वाटेकरी असल्याने हा प्रकार घडत आहे. प्रामाणिक व्यवसाय केला असता, तर दुकानदार जगूच शकले नसते. कारण या व्यवसायाची रचनाच तशी करण्यात आली होती. आम्हालाही हा अप्रामाणिकपणा संपवायचा आहे. मागणीप्रमाणे आम्हाला पन्नास हजार प्रतिमाह मानधन दिल्यास प्रामाणिक व्यवसायास आम्ही कटिबद्ध आहोत. रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा इशारा हल्ली दिला जात आहे. वास्तविक एखादे दुकान तहसीलदारांना चालवायला द्यावे, म्हणजे त्यांना या व्यवसायातील व्यथा कळतील, असे ते म्हणाले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, वसंत अग्रवाल, बाळासाहेब कोरे, यशवंत भोरे, शशिकांत मोरे, प्रभाकर कोळपकर, संदीप ठोंबरे, आनंदराव पाटील, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, दीपक उपाध्ये, कुमार कोळी, पांडुरंग जमदाडे आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्यारास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५० हजार मानधन देण्यात यावे, अन्न सुरक्षा कायद्यानुसार द्वारपोच धान्य योजना चालू व्हावी, केशरी शिधापत्रिकाधारकांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणे धान्य देण्यात यावे, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकांची बंद झालेली साखर पुन्हा सुरू करावी, रॉकेल हॉकर्सना लिटरला दोन रुपये कमिशन मिळावे, त्यांना पाच किलो गॅसची एजन्सी देण्यात यावी, आधारकार्ड जमा करण्याच्या कामास प्रशासनाने डिसेंबरअखेर मुदतवाढ द्यावी, पॉझ यंत्राद्वारे धान्य वाटप करताना येणाºया तुटीबाबत शासनाने कायदा करावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.