शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रेशनिंगच्या हातचलाखीत अधिकारी वाटेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत माजी खासदार गजानन बाबर यांनी बुधवारी रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीच्या मार्केट यार्डातील वसंतदादा भवनात आॅल महाराष्टÑ फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. बाबर म्हणाले की, रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५0 हजार मानधन देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. येत्या १ सप्टेंबरपर्यंत महामंडळ स्थापन करून मानधन सुरू केले नाही, तर आधार नोेंदणीसाठी दुकानदारांना दिलेले पॉझ यंत्र आम्ही शासनाला परत करू. दुकानदारांच्या समस्या समजून घेण्यापेक्षा त्यांच्याकडे अप्रामाणिक म्हणून पाहिले जाते. शासनाची ही दृष्टी असली तरी, या गोष्टीस शासकीय अधिकारीच कारणीभूत आहेत.गेल्या काही वर्षांपासून रेशनिंग व्यावसायात हातचलाखीचा प्रकार सुरू असल्याची गोष्ट खरी आहे. सरकारी अधिकारीच वाटेकरी असल्याने हा प्रकार घडत आहे. प्रामाणिक व्यवसाय केला असता, तर दुकानदार जगूच शकले नसते. कारण या व्यवसायाची रचनाच तशी करण्यात आली होती. आम्हालाही हा अप्रामाणिकपणा संपवायचा आहे. मागणीप्रमाणे आम्हाला पन्नास हजार प्रतिमाह मानधन दिल्यास प्रामाणिक व्यवसायास आम्ही कटिबद्ध आहोत. रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा इशारा हल्ली दिला जात आहे. वास्तविक एखादे दुकान तहसीलदारांना चालवायला द्यावे, म्हणजे त्यांना या व्यवसायातील व्यथा कळतील, असे ते म्हणाले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, वसंत अग्रवाल, बाळासाहेब कोरे, यशवंत भोरे, शशिकांत मोरे, प्रभाकर कोळपकर, संदीप ठोंबरे, आनंदराव पाटील, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, दीपक उपाध्ये, कुमार कोळी, पांडुरंग जमदाडे आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्यारास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तामिळनाडू व अन्य काही राज्यांप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करावे व प्रतिमाह दुकानदारांना ५० हजार मानधन देण्यात यावे, अन्न सुरक्षा कायद्यानुसार द्वारपोच धान्य योजना चालू व्हावी, केशरी शिधापत्रिकाधारकांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणे धान्य देण्यात यावे, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकांची बंद झालेली साखर पुन्हा सुरू करावी, रॉकेल हॉकर्सना लिटरला दोन रुपये कमिशन मिळावे, त्यांना पाच किलो गॅसची एजन्सी देण्यात यावी, आधारकार्ड जमा करण्याच्या कामास प्रशासनाने डिसेंबरअखेर मुदतवाढ द्यावी, पॉझ यंत्राद्वारे धान्य वाटप करताना येणाºया तुटीबाबत शासनाने कायदा करावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.