शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय नेतृत्वाच्या संधीचा पिता-पुत्रांचा दुर्मिळ योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:59 IST

सांगली : राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राजारामबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत जयंत पाटील यांनीही आपली स्वतंत्र छाप पाडली. राजारामबापूंनी काँग्रेस व जनता पक्ष अशा वेगवेगळ्या पक्षांचे राज्याचे नेतृत्व केले. आता जयंत पाटील यांच्याहाती राष्टÑवादीच्या राज्याच्या नेतृत्वाचे दोर आल्याने, पिता-पुत्रांना अशाप्रकारे राज्यस्तरावर पक्षीय नेतृत्व करण्याची संधी ...

सांगली : राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राजारामबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत जयंत पाटील यांनीही आपली स्वतंत्र छाप पाडली. राजारामबापूंनी काँग्रेस व जनता पक्ष अशा वेगवेगळ्या पक्षांचे राज्याचे नेतृत्व केले. आता जयंत पाटील यांच्याहाती राष्टÑवादीच्या राज्याच्या नेतृत्वाचे दोर आल्याने, पिता-पुत्रांना अशाप्रकारे राज्यस्तरावर पक्षीय नेतृत्व करण्याची संधी मिळण्याचा दुर्मिळ योग नोंदला गेला आहे.राजारामबापू पाटील यांनी १९५९ मध्ये प्रदेश काँगे्रसचे आणि १९७७ मध्ये जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. त्यानंतर पुन्हा १९८0 ला त्यांची फेरनिवड झाली होती. राज्याच्या मंत्रिमंडळातही महत्त्वाची खाती भूषविताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनाही अस्तित्वात आणल्या. राज्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव प्रदीर्घकाळ राहिला. त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांनीही त्याचपद्धतीने आपली वाटचाल केली. संस्था उभारून संघटन बळकट करण्याच्याबाबतीत त्यांनी अधिक प्रभावी काम केले. सलग सहावेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा पराक्रमही त्यांनी केला. अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. विशेष म्हणजे अर्थ व ग्रामविकास ही दोन्ही खातीही राजारामबापूंनी सांभाळली होती. याच काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते. अगदी राजारामबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकताना जयंत पाटील यांनीही आपली छाप पाडली. केवळ कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्म घेऊन त्यांच्या कार्याच्या भांडवलावर मोठे होण्याचा प्रयत्न कधीच जयंत पाटील यांनी केला नाही. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले.त्रिमूर्तींच्या नावे : योगायोग नोंदला...सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील हे राज्यातील राजकारणातील त्रिमूर्ती म्हणून परिचित होते. एकाचवेळी मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या या तिन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभाव टाकला. तिघांची वक्तृत्वशैली वेगळी असली तरी, ती प्रभावी ठरली. तिघांनीही मोठी खाती सांभाळली. आर. आर. पाटील यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपद, पतंगराव कदम यांनी काँग्रेसचे प्रभारी प्रदेशाध्यक्षपद यापूर्वी भूषविले होते. आता जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तिन्ही नेत्यांच्या नावे पक्षीय नेतृत्वाचीही नोंद झाली आहे. आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम आता हयात नसल्याने जयंत पाटील भाजपविरोधात एकाकी लढत आहेत.