शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प ठेवीच्या नावाखाली कारखान्यांकडून खंडणी वसुली

By admin | Updated: October 1, 2015 22:51 IST

बी. जी. पाटील : साखर आयुक्तांकडे तक्रार

इस्लामपूर : प्रकल्प ठेवीच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून एफआरपीच्या रकमेतील काही रक्कम कपात करण्यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. यामध्ये वाळवा तालुक्यातील राजारामबापू साखर कारखाना आघाडीवर आहे. याविरोधात बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे.याबाबत पाटील यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, बळिराजापुढे अनेक संकटे आ वासून उभी आहेत. गतवर्षी २०१४—१५ गळीत हंगामात गेलेल्या उसाच्या बिलाची एफआरपीनुसार मिळणारी योग्य किंमत आजही काही कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. काही कारखान्यांनी ही रक्कम जमा करतानाच खंडणीप्रमाणे वसुलीचा नवा पायंडा सुरू केला आहे. जमा झालेल्या रकमेतून शासन निधी खात्यावर जमा करीत आहे. परंतु एफआरपीचा ताळमेळ घालताना कारखान्याने जमा करावयाची जी रक्कम आहे, त्याच्याशी सुसंगत असणारा आकडा म्हणजे प्रतिटन कपात करण्यासाठी बँकेचे संमतीपत्र घेणे दांडगाव्याने सुरु केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राजारामबापू साखर कारखान्याचा समावेश आहे.बँकेला संमतीपत्र देऊन पैसे कपात करण्यास आमचा विरोध आहे. ही कपात नसून एक प्रकारची खंडणीच आहे. त्याचे कारण म्हणजे कोणतीही ठेव रक्कम रोख स्वरुपात घेण्याचा नियम आहे. म्हणूनच एकीकडे ऊस लागण कार्यक्रम, ऊस तोड, गावा-गावात अडलेले शेतकऱ्यांचे हितसंबंध यामुळे शेतकरी अगतिक झाला आहे. या अगतिकतेचा फायदा उठवून प्रकल्प ठेवीच्या नावाखाली अर्ज भरुन घेतले जात आहेत. यावर साखर संचालकांनी तातडीने कारवाई करावी. तसेच संबंधित असणाऱ्या सर्व साखर कारखान्यांना आदेश देऊन गत वर्षातील उसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आमचा विरोधबँकेला संमतीपत्र देऊन पैसे कपात करण्यास आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना शेती परवडत नसून यावर्षी नैसर्गिक संकटात तो सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शासनाकडून मिळालेल्या पैशातून कपात करणे पूर्णत: चुकीचे आहे. म्हणूनच आमचा त्यास तीव्र विरोध आहे, असे पाटील यांनी सांगितले.