शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

एटीएम यंत्रांची सुरक्षा रामभरोस

By admin | Updated: November 5, 2014 00:09 IST

शिराळ्यातील स्थिती : सहापैकी दोनच ठिकाणी सुरक्षारक्षके

विकास शहा - शिराळा शहरात सहा बॅँकांनी एटीएम यंत्राची व्यवस्था केली आहे. मात्र दोनच बँकांनी तेथे सुरक्षारक्षक नेमले असून, इतर बॅँकांनी मात्र त्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. काही बॅँकांची एटीएम यंत्रणा बॅँकेच्या वेळेपुरतीच चालू असते. त्यामुळे ही सेवा असुरक्षित व बेभरवशाची बनली आहे. शिराळ्यात स्टेट बॅँक आॅफ इंडिया, युनियन बॅँक आॅफ इंडिया, बॅँक आॅफ इंडिया, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सीस बॅँक येथे एटीएम यंत्राची व्यवस्था आहे. मध्यवर्ती बॅँक, युनियन वगळता इतर चारही एटीएम मशीन बसस्थानकापासून थोड्या अंतरावर आहेत. या एटीएम यंत्र असलेल्या खोलीच्या दरवाजाच्या ठराविक ठिकाणी एटीएम कार्ड घातले तर दरवाजा उघडला पाहिजे. मात्र तसे न होता या सर्वच ठिकाणी दरवाजा सहजपणे उघडला जातो. आयसीआयसीआय व अ‍ॅक्सीस बॅँकेच्या एटीएम यंत्राठिकाणीच फक्त सुरक्षारक्षक आहेत. मात्र स्टेट बॅँक आॅफ इंडिया, युनियन बॅँक, बॅँक आॅफ इंडिया, मध्यवर्ती बॅँकेच्या एटीएम यंत्राच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाच नाही. मध्यवर्ती बॅँकेचे एटीएम यंत्र फक्त बॅँक कार्यालयीन वेळेतच सुरू असते. त्यानंतर याचा दरवाजा तसेच बॅँकेच्या शाखेचे मुख्य गेट बंद असते. यामुळे या बॅँकेची ही व्यवस्था कुचकामी ठरत आहे.राष्ट्रीयीकृत बॅँकांमार्फत या एटीएम व्यवस्थेचा कंपनींना ठेका दिला गेला आहे. दरमहा ५० ते ६० हजार रुपये ही बॅँक या ठेकेदाराला देतात. यामध्ये ठेकेदाराकडून सुरक्षा व्यवस्था, या जागेचे भाडे, स्वच्छता आदींचा समावेश असतो. एटीएम व्यवस्थेबाबत सर्व बॅँकांमार्फत विमा उतरविला जातो. काही घडलेच तर विमा कंपनीकडून मोबदला मिळतो. या बॅँकेमार्फत मात्र सुरक्षा व्यवस्था नाही, की साधे दरवाजांना कुलूप नाही. एखाद्या वेळेस एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकास लुटले जाण्याची भीती आहे. याकडे बॅँक तसेच ठेकेदारांनी लक्ष देऊन तातडीने सुरक्षाव्यवस्था पुरवावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. जिल्हा बँकेचे एटीएम रात्री बंदचसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम केवळ बँकेच्या कार्यालयीन वेळेतच सुरू असते. बँकेचे कामकाज संपले की एटीएमही बंद होते. बँकेचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केले जाते. त्यामुळे रात्रीच्यावेळी ग्राहकांना जिल्हा बँकेच्या एटीएमचा फारसा उपयोग होत नाही. इतर बँकांप्रमाणे जिल्हा बँकेचे ग्राहकही मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यांना या यंत्रणेचा लाभ होत नाही. शिराळ्यातील बसस्थानक परिसरात विविध बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम यंत्रणा उभारली आहे. रात्रीच्यावेळी या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असते. कोणत्याही एटीएमजवळ सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे ग्राहकांना लुटले जाण्याची भीती आहे.