शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधण्यास राजू शेट्टी सरसावले

By admin | Updated: June 24, 2014 01:20 IST

इस्लामपूर मतदारसंघ : जयंतरावविरोधी नेते पुन्हा एकत्र येणार, विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी

अशोक पाटील, इस्लामपूर : निवडणूक कोणतीही असो, वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणे सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलत असतात! यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील हवा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील याबाबत शाश्वती नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधातील नेत्यांची मोट बांधण्याच्या तयारीला खासदार राजू शेट्टी लागले आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवाजीराव नाईक आणि नानासाहेब महाडिक यांच्यातील दरी रुंदावली आहे. ती आताही कायम आहे. विधानसभा निवडणुकीत या दोघा नेत्यांना एकमेकांची गरज भासणार आहे. याची कल्पना असल्याने राजू शेट्टी या दोघांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील आणि शिवाजीराव नाईक मागील विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांपासून दुरावले आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत सी. बी. पाटील यांचे पुत्र जयराज यांना बसला. त्यामुळे आता नाईक आणि पाटील यांच्यातही समझोता करण्याचा प्रयत्न होणार आहे.मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींबरोबर असलेले हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या पाठीशी होते. काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे नायकवडी यांना पुढील काळात महायुतीशी समझोता करावा लागेल, असे बोलले जाते. सध्या हुतात्मा संकुलातील मतदार नायकवडी यांचा शब्द प्रमाण मानतीलच, असे वातावरण नाही. मागील विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गट जयंत पाटील यांच्या बाजूने असल्याने नायकवडी यांचे नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे. आता नायकवडी आणि महाडिक यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याने खा. शेट्टी त्यांच्यात एकमत करण्याच्या प्रयत्नात आहेत.वाळवा-शिराळ्यात काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिराळ्यात मानसिंगराव नाईक निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत, तर हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास सत्यजित देशमुख व या दोघांच्या विरोधात शिवाजीराव नाईक यांनी दंड थोपटले आहेत. आघाडीतील बिघाडीचा फायदा आम्हालाच होणार, असे दोन्ही नाईकांचे कार्यकर्ते बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथेही शिवाजीराव नाईक यांच्याबाजूने फळी उभी करण्यासाठी खा. शेट्टी तयारीला लागले आहेत. तथापि जयंत पाटील यांचे विरोधक एकत्र येत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी इस्लामपूर मतदारसंघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, सदाभाऊ खोत, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, आनंदराव पवार यांना एकत्र आणून त्यांची मोट बांधणे हेच आव्हान शेट्टी यांच्यासमोर असेल. यात ते यशस्वी झाले तर या इस्लामपुरात तुंबळ राजकीय लढाई पहायला मिळणार आहे.