शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राजू शेट्टींना मंत्रीपदाची संधी धूसर

By admin | Updated: May 24, 2014 00:42 IST

नाराजीचा सूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता

अशोक पाटील, इस्लामपूर शरद पवार यांचे पानिपत होणार आणि राजू शेट्टी यांना केंद्रीय कृषिमंत्रीपद मिळणार, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केला जात होता. निवडणुकीत भाजपचे बहुमत आणि राष्ट्रवादीचे पानिपत झाल्यानंतर मंत्रीपदासाठी शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी दिल्लीत तळ ठोकला आहे, परंतु पहिल्या टप्प्यात शेट्टी यांना मंत्रीपद मिळण्याची आशा धूसर झाल्याचे समजते. त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी नाराज होऊन गावची वाट धरली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पश्चिम महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगामास प्रारंभ झाला होता. उसाला तीन हजार रुपये दर मिळावा यासाठी शेट्टी यांचे आंदोलन पेटले होते. त्यामुळे या भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साखरसम्राटांनी शेट्टींचे आंदोलन मोडीत काढण्याचा चंग बांधला होता. त्यात प्रामुख्याने मावळते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आघाडीवर होते. त्यामुळेच आंदोलनानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात महायुतीतर्फे शेट्टी विरुध्द जयंत पाटील अशीच लढत मानली जात होती. शेट्टी यांच्या प्रचारसभांतून पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि शेट्टी यांना केंद्रीय कृषिमंत्रीपद मिळणार, असे दावे केले जात होते. निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच शेट्टींना मंत्रीपद मिळणार, असे गृहित धरून शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली, परंतु नरेंद्र मोदी यांनी शेट्टी यांची अजूनही दखल घेतली नसल्याचे समजते. सध्या केंद्रात भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी पक्षातील खासदारांना मंत्रीपद मिळणे अवघड आहे. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव राजू शेट्टीच निवडून आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी त्यांना संधी मिळणे कठीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.