शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राजारामबापू म्हणजे शिक्षणाद्वारे क्रांती करणारे क्रांतीदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव ...

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव होता. यातूनच त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करून शांततामय मार्गाने क्रांती घडवून आणली म्हणून ते खऱ्या अर्थाने क्रांतीदूत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय थोरात यांनी केले.

येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या स्म़तिदिनानिमित्त लीड कॉलेज व सी. पी. ई. अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. थोरात म्हणाले की, बापू हे खऱ्या अर्थाने युगपुरूष होते. कारण त्यांनी स्थानिक समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून ठेवल्या. विविध संस्थांचे जाळे उभारून येथील लोकांचे जीवनमान उंचावले. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पदयात्रा काढल्या म्हणूनच सामान्यांशी नाळ जोडलेला ‘पदयात्री’ असे त्यांना म्हटले जाते.

डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले की, बापू जावून आज ३७ वर्षे झाली. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आजही समोर येतात. यावरूनच त्यांच्या कार्याची व व्यक्तिमत्वाची व्यापकता लक्षात येते. प्रा. डॉ. प्रकाश मानगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. डी. जे. दमामे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो - २००१२०२१-आयएसएलएम-राजारामबापू पुण्यतिथी न्यूज

इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात आयोजित व्याख्यानात प्रा. डॉ. संजय थोरात यांनी मार्गदर्शन केले.