शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

राजारामबापू कारखान्याच्या कर्जप्रकरणावरून खडाजंगी

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

जिल्हा बॅँक बैठक : बॅँकेला राजकीय अड्डा बनविल्याचा विशाल पाटील यांचा आरोप

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला ४० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकेच्या सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. कॉँग्रेसचे सदस्य विशाल पाटील यांनी राजारामबापू कारखान्याला नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप यावेळी केला. दुसरीकडे बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावताना, कोणतीही नियमबाह्य प्रक्रिया राबविली नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी दुपारी पार पडली. साडेतीन तास ही सभा सुरू होती. राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटला बॅँकेने चाळीस कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने या बैठकीत विशाल पाटील यांनी सत्ताधारी गटावर हल्लाबोल केला. बॅँकेचा वापर स्वत:च्या संस्था टिकविण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजारामबापू बॅँक शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा) असतानाही कर्जवाटप कसे केले?, एकच संस्था असतानाही चार वेगवेगळे कारखाने दाखवून मर्यादेपेक्षा जास्त कर्जपुरवठा कोणत्या कायद्याच्या आधारे मंजूर केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिलीपतात्या पाटील यांनी कारखान्याची स्वतंत्र चार मर्यादेपेक्षा जादा कर्ज विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एखाद्या संस्थेला कर्जपुरवठा करताना १२७ कोटीची मर्यादा असताना, राजारामबापू कारखान्यास २९२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. अपुरा दुरावा असतानाही कारखान्याच्या चारही युनिटना प्रत्येकी १0 कोटी रुपयांप्रमाणे ४0 कोटी रुपये तात्पुरते कर्ज देण्यात आले आहे. बँकेच्या माध्यमातून स्वत:च्या संस्थांचा फायदा केला जात आहे. चार वेगवेगळी युनिट असली तरी, राजारामबापू सहकारी साखर कारखाना ही एकच संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतंत्र युनिट म्हणून पाहताच येत नाही. तरीही नियमबाह्य कर्जपुरवठा करण्यात आला आहे. समित्यांवरूनही नाराजी कार्यकारी समिती, लेखापरीक्षण समिती नियुक्त करण्यावरूनही काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. समिती सदस्यत्वासाठी नेमके काय निकष लावण्यात आले, असा सवाल प्रताप पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर या समित्यांमध्ये चार महिन्यांनी बदल होत असतो. त्यामुळे पुढील काळात प्रत्येकालाच संधी मिळू शकते, असे स्पष्टीकरण दिलीपतात्या पाटील यांनी दिले.