शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

कर्नाटकला राजापूर बंधा-यातून पाणी सोडले

By admin | Updated: April 13, 2017 21:28 IST

कर्नाटकात सीमाभागातील गावात तीव्र पाणी टंचाईमुळे शिरोळजवळ राजापूर बंधा-यातून गुरुवारी पाणी सोडण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 13 - कर्नाटकात सीमाभागातील गावात तीव्र पाणी टंचाईमुळे शिरोळजवळ राजापूर बंधा-यातून गुरुवारी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकसाठी कोयना धरणातून प्रतिसेकंद ३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, २.६ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. राजापूर बंधाºयातून प्रतिसेकंद १ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, शुक्रवारी कुडचीपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे.
राजापूर येथील बंधाºयापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जलसंपदा विभागाकडे केली होती. महाराष्ट्रात धरणे बांधताना कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने अक्कलकोट परिसरात पाणी सोडले होते.
चांगल्या पावसाने वारणा व कोयना धरणात यावर्षी पुरेसा पाणीसाठा असल्याने महाराष्टÑातून कर्नाटकला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. कर्नाटकच्या मागणीबाबत जलसंपदा विभागाने सांगली पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर गुरुवारी राजापूर बंधाºयातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात आले. कोयना धरणातून २.६ टीएमसी पाणी कर्नाटकात सोडण्यात येणार असून, सुमारे एक महिना राजापूर बंधाºयातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकला पाणी सोडण्यात येत असल्याने सांगली, मिरज परिसरात नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, पाणी प्रवाहित राहणार आहे.
कर्नाटकात पाणीटंचाई-
कर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणी टंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. पाणी टंचाईने त्रस्त सीमा भागातील ग्रामस्थांना महाराष्टÑातून पाणी सोडण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.