शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

पावसाची ओढ... चिंतेचे ढग...

By admin | Updated: June 30, 2015 23:17 IST

६२ टक्के पेरणी : ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात १६ टँकर

अंजर अथणीकर - सांगली -गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाची सुमारे ६२ टक्के पेरणी झाली असताना, ऐन पावसाळ्यात मात्र सोळा पाणी टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने डिसेंबर ते मेअखेर पाच वेळा अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मान्सूनला सुरुवात होऊन आता वीस दिवसांचा कालावधी उलटला. पहिला आठवडा वगळता पावसाने तशी पाठच फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे शेतकरी हबकला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. २५ जूनअखेर जिल्ह्यात ४९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मिरज तालुक्यात १९ हजार ९७० हेक्टरवर, जत तालुक्यात ६ हजार ६९५ हेक्टरवर, खानापूर तालुक्यात १३ हेक्टरवर, वाळवा तालुक्यात ३ हजार १८२ हेक्टरवर, तासगाव तालुक्यात १५० हेक्टरवर, शिराळा तालुक्यात १४ हजार ६७० हेक्टरवर, कवठेमहांकाळ तालुक्यात २ हजार ७०१ हेक्टरवर, पलूस तालुक्यात २ हजार ८० हेक्टरवर आणि कडेगाव तालुक्यात २ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात मेअखेर एकही टँकर सुरु नसताना, आता मात्र सोळा टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जत, तासगाव, खानापूर व शिराळा तालुक्यातील १४ गावांमध्ये सुमारे ४७ हजार लोकांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी चौदा विहिरींचे आता अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा पाऊस आणि पाणीसाठा अधिक गतवर्षी जूनमध्ये पाऊस पूर्णपणे गायब होता. जुलैमध्ये गतवर्षी पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. जत वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. वारणा धरणात सध्या २३.५४ टीएमसी (६८.४२ टक्के) पाणीसाठा आहे. त्याचबरोबर कोयना धरणात सध्या ५०.५१ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी जूनअखेर वारणा धरणात १२.०२ टीएमसी (३४ टक्के), तर कोयना धरणात १३.९७ टीएमसी (१४ टक्के) पाणीसाठा होता.गेल्या आठ दिवसात तसा पाऊस गायब आहे. काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या आहेत. आगामी आठ दिवसात हलक्या पावसाच्या सरी वर्तवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाची गरज आहे. जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के पेरण्या झाल्या असून, आगामी आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर समस्या निर्माण होणार आहेत.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, सांगली.