शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची ओढ... चिंतेचे ढग...

By admin | Updated: June 30, 2015 23:17 IST

६२ टक्के पेरणी : ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात १६ टँकर

अंजर अथणीकर - सांगली -गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाची सुमारे ६२ टक्के पेरणी झाली असताना, ऐन पावसाळ्यात मात्र सोळा पाणी टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने डिसेंबर ते मेअखेर पाच वेळा अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मान्सूनला सुरुवात होऊन आता वीस दिवसांचा कालावधी उलटला. पहिला आठवडा वगळता पावसाने तशी पाठच फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे शेतकरी हबकला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. २५ जूनअखेर जिल्ह्यात ४९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मिरज तालुक्यात १९ हजार ९७० हेक्टरवर, जत तालुक्यात ६ हजार ६९५ हेक्टरवर, खानापूर तालुक्यात १३ हेक्टरवर, वाळवा तालुक्यात ३ हजार १८२ हेक्टरवर, तासगाव तालुक्यात १५० हेक्टरवर, शिराळा तालुक्यात १४ हजार ६७० हेक्टरवर, कवठेमहांकाळ तालुक्यात २ हजार ७०१ हेक्टरवर, पलूस तालुक्यात २ हजार ८० हेक्टरवर आणि कडेगाव तालुक्यात २ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात मेअखेर एकही टँकर सुरु नसताना, आता मात्र सोळा टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जत, तासगाव, खानापूर व शिराळा तालुक्यातील १४ गावांमध्ये सुमारे ४७ हजार लोकांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी चौदा विहिरींचे आता अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा पाऊस आणि पाणीसाठा अधिक गतवर्षी जूनमध्ये पाऊस पूर्णपणे गायब होता. जुलैमध्ये गतवर्षी पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. जत वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. वारणा धरणात सध्या २३.५४ टीएमसी (६८.४२ टक्के) पाणीसाठा आहे. त्याचबरोबर कोयना धरणात सध्या ५०.५१ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी जूनअखेर वारणा धरणात १२.०२ टीएमसी (३४ टक्के), तर कोयना धरणात १३.९७ टीएमसी (१४ टक्के) पाणीसाठा होता.गेल्या आठ दिवसात तसा पाऊस गायब आहे. काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या आहेत. आगामी आठ दिवसात हलक्या पावसाच्या सरी वर्तवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाची गरज आहे. जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के पेरण्या झाल्या असून, आगामी आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर समस्या निर्माण होणार आहेत.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, सांगली.