शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पावसाची ओढ... चिंतेचे ढग...

By admin | Updated: June 30, 2015 23:17 IST

६२ टक्के पेरणी : ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात १६ टँकर

अंजर अथणीकर - सांगली -गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाची सुमारे ६२ टक्के पेरणी झाली असताना, ऐन पावसाळ्यात मात्र सोळा पाणी टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने डिसेंबर ते मेअखेर पाच वेळा अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मान्सूनला सुरुवात होऊन आता वीस दिवसांचा कालावधी उलटला. पहिला आठवडा वगळता पावसाने तशी पाठच फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे शेतकरी हबकला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. २५ जूनअखेर जिल्ह्यात ४९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मिरज तालुक्यात १९ हजार ९७० हेक्टरवर, जत तालुक्यात ६ हजार ६९५ हेक्टरवर, खानापूर तालुक्यात १३ हेक्टरवर, वाळवा तालुक्यात ३ हजार १८२ हेक्टरवर, तासगाव तालुक्यात १५० हेक्टरवर, शिराळा तालुक्यात १४ हजार ६७० हेक्टरवर, कवठेमहांकाळ तालुक्यात २ हजार ७०१ हेक्टरवर, पलूस तालुक्यात २ हजार ८० हेक्टरवर आणि कडेगाव तालुक्यात २ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात मेअखेर एकही टँकर सुरु नसताना, आता मात्र सोळा टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जत, तासगाव, खानापूर व शिराळा तालुक्यातील १४ गावांमध्ये सुमारे ४७ हजार लोकांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी चौदा विहिरींचे आता अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा पाऊस आणि पाणीसाठा अधिक गतवर्षी जूनमध्ये पाऊस पूर्णपणे गायब होता. जुलैमध्ये गतवर्षी पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. जत वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. वारणा धरणात सध्या २३.५४ टीएमसी (६८.४२ टक्के) पाणीसाठा आहे. त्याचबरोबर कोयना धरणात सध्या ५०.५१ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी जूनअखेर वारणा धरणात १२.०२ टीएमसी (३४ टक्के), तर कोयना धरणात १३.९७ टीएमसी (१४ टक्के) पाणीसाठा होता.गेल्या आठ दिवसात तसा पाऊस गायब आहे. काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या आहेत. आगामी आठ दिवसात हलक्या पावसाच्या सरी वर्तवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाची गरज आहे. जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के पेरण्या झाल्या असून, आगामी आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर समस्या निर्माण होणार आहेत.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, सांगली.