शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आटपाडीकरांना पावसाने दिलासा

By admin | Updated: October 6, 2015 00:35 IST

रब्बी पेरणीला उपयुक्त : तालुक्यातील शंभर टक्के पेरणी होणार

अविनाश बाड -- आटपाडी --दुष्काळाच्या संकटाने धास्तावलेल्या आटपाडीकरांना दमदार पावसाने दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत आटपाडी आणि महाडिकवाडी हे दोन तलाव भरले. तालुक्याच्या पूर्व भागावर पावसाने कृपा केल्याने आटपाडी आणि दिघंचीतील पावसाची सरासरी ओलांडली आहे. डाळिंबाला जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील ४४ हजार ३०० हेक्टरवर म्हणजे १०० टक्के पेरणी क्षेत्रात रब्बी हंगामाची पेरणी होणार आहे. यंदा पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ‘खुशी’, तर पश्चिम भागात ‘गम’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे.भीषण दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर असलेल्या तालुक्याला परतीच्या पावसाने चांगली साथ दिली आहे. सप्टेंबर महिन्यात दि. ६ पासून दि. १७ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला असला तरी, या पावसाने रब्बी हंगामाच्या पेरणीची आशा बळावली.दि. १५ सप्टेंबर ते दि. १५ आॅक्टोबर हा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी उत्तम कालावधी मानला जातो. सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसावर पेरणी केली, तर आगाप होऊन आॅक्टोबर ‘हीट’मध्येही पिके सापडून पाऊस लांबला, तर अनिष्ट परिणाम होण्याची भीती होती. तरीही काही शेतकऱ्यांनी ज्यांची राने पेरणीसाठी तयार होती, त्यांनी पेरणीचे धाडस केले.दरम्यान, या पावसाने तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना मोठे जीवदान मिळाले. डाळिंबाच्या बागांसाठी अनेक ठिकाणी सुरू असलेले टॅँकर बंद झाले. पण ओढे, नाले आणि माणगंगा नदी वाहून तलावातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत तालुकावासीय होते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तालुकावासीय काहीसे धास्तावले होते. पण दि. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात पुन्हा पावसाने आगमन केले. दि. ४ रोजी तालुक्यात कुठेच पाऊस झाला नाही. मात्र हा अपवाद वगळता ४ दिवस पावसाने कृपा केल्याने पूर्व भागातील पावसाची सरासरी अ‍ेलांडली. तालुक्यात सरासरी ३५५ मि.मी. एवढा पाऊस पडतो. आजअखेर तालुक्यात आटपाडीत ३५७ मि.मी., दिघंचीत ४४० मि.मी., तर खरसुंडीत २५५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी विठलापूरच्या ओढ्याला पाणी आले आहे. माणगंगा नदीला मात्र थोडे पाणी आहे. तालुक्यातील ओढे वाहण्यासाठी पश्चिम भागात चांगला पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तिकडेच यंदा पर्जन्यमान कमी आहे. तरीही या पावसाने पेरणी होणार असली तरी तालुक्यातील सर्व तलाव भरण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.छावणी चालकांचा नवस वाया गेला!महिन्याभरापूर्वी तालुक्यावर भीषण दुष्काळाची छाया होती. त्यामुळे जनावरांसाठी छावण्या काढून मालामाल होण्यासाठी टपलेल्या काही पांढऱ्या बोक्यांनी चक्क तालुक्यात पाऊस पडू नये आणि आपल्याला छावणी मिळावी यासाठी लोटेवाडीच्या एका देवतेला नवस केल्याची चर्चा होती. काही छावणीचालकांनी तहसील कार्यालयात छावणीसाठी अर्जही केले होते, पण देवाने छावणी चालकांचे ऐकल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या पावसाने तालुकावासीयांना खूश केले असले तरी, काही छावणीचालक मात्र नाराज झाले आहेत.