शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

आटपाडीकरांना पावसाने दिलासा

By admin | Updated: October 6, 2015 00:35 IST

रब्बी पेरणीला उपयुक्त : तालुक्यातील शंभर टक्के पेरणी होणार

अविनाश बाड -- आटपाडी --दुष्काळाच्या संकटाने धास्तावलेल्या आटपाडीकरांना दमदार पावसाने दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत आटपाडी आणि महाडिकवाडी हे दोन तलाव भरले. तालुक्याच्या पूर्व भागावर पावसाने कृपा केल्याने आटपाडी आणि दिघंचीतील पावसाची सरासरी ओलांडली आहे. डाळिंबाला जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील ४४ हजार ३०० हेक्टरवर म्हणजे १०० टक्के पेरणी क्षेत्रात रब्बी हंगामाची पेरणी होणार आहे. यंदा पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ‘खुशी’, तर पश्चिम भागात ‘गम’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे.भीषण दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर असलेल्या तालुक्याला परतीच्या पावसाने चांगली साथ दिली आहे. सप्टेंबर महिन्यात दि. ६ पासून दि. १७ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला असला तरी, या पावसाने रब्बी हंगामाच्या पेरणीची आशा बळावली.दि. १५ सप्टेंबर ते दि. १५ आॅक्टोबर हा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी उत्तम कालावधी मानला जातो. सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसावर पेरणी केली, तर आगाप होऊन आॅक्टोबर ‘हीट’मध्येही पिके सापडून पाऊस लांबला, तर अनिष्ट परिणाम होण्याची भीती होती. तरीही काही शेतकऱ्यांनी ज्यांची राने पेरणीसाठी तयार होती, त्यांनी पेरणीचे धाडस केले.दरम्यान, या पावसाने तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना मोठे जीवदान मिळाले. डाळिंबाच्या बागांसाठी अनेक ठिकाणी सुरू असलेले टॅँकर बंद झाले. पण ओढे, नाले आणि माणगंगा नदी वाहून तलावातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत तालुकावासीय होते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तालुकावासीय काहीसे धास्तावले होते. पण दि. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात पुन्हा पावसाने आगमन केले. दि. ४ रोजी तालुक्यात कुठेच पाऊस झाला नाही. मात्र हा अपवाद वगळता ४ दिवस पावसाने कृपा केल्याने पूर्व भागातील पावसाची सरासरी अ‍ेलांडली. तालुक्यात सरासरी ३५५ मि.मी. एवढा पाऊस पडतो. आजअखेर तालुक्यात आटपाडीत ३५७ मि.मी., दिघंचीत ४४० मि.मी., तर खरसुंडीत २५५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी विठलापूरच्या ओढ्याला पाणी आले आहे. माणगंगा नदीला मात्र थोडे पाणी आहे. तालुक्यातील ओढे वाहण्यासाठी पश्चिम भागात चांगला पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तिकडेच यंदा पर्जन्यमान कमी आहे. तरीही या पावसाने पेरणी होणार असली तरी तालुक्यातील सर्व तलाव भरण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.छावणी चालकांचा नवस वाया गेला!महिन्याभरापूर्वी तालुक्यावर भीषण दुष्काळाची छाया होती. त्यामुळे जनावरांसाठी छावण्या काढून मालामाल होण्यासाठी टपलेल्या काही पांढऱ्या बोक्यांनी चक्क तालुक्यात पाऊस पडू नये आणि आपल्याला छावणी मिळावी यासाठी लोटेवाडीच्या एका देवतेला नवस केल्याची चर्चा होती. काही छावणीचालकांनी तहसील कार्यालयात छावणीसाठी अर्जही केले होते, पण देवाने छावणी चालकांचे ऐकल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या पावसाने तालुकावासीयांना खूश केले असले तरी, काही छावणीचालक मात्र नाराज झाले आहेत.