शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:30 IST

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली असून सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने मंगळवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अपेक्षाभंग केल्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटले होते. ही चिंता दूर करीत पावसाने मंगळवारी मुहूर्त साधत दिवसभर मुक्काम ठोकला. सांगली, मिरज परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा जोर नसला तरी, तो कायम असल्याने संपूर्ण शहराला या हलक्या सरींनी चिंब भिजविले. शहराच्या सखल भागात पाणी साचले असून गुंठेवारी भागात पुन्हा दलदल निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही रिमझिम चालू असून शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. तासगाव तालुक्यात पावसाचे आगमनतासगाव : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला नसला तरी, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या अपेक्षेत आहे. सोमवारी सकाळपासूनच तासगाव शहरासह तालुक्यातील लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव, चिंचणी, विसापूर, हातनूर, पेड, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली. द्राक्षबागांना हा पाऊस पोषक ठरून बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या सुरु होण्यासाठी मात्र शेतकरी अजून दमदार पावसाच्या अपेक्षेत आहेत. पलूस परिसरात पावसाची हजेरीपलूस : पलूस तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप चालू झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात असून मंगळवारपासून टोकणीची कामे सुरू झाली आहेत. गेल्या दीड महिन्यापासून चातकासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा या पावसामुळे सुखावला असून आता पेरणी व टोकणीच्या कामाला गती आली आहे. सध्या तालुक्यात फक्त पस्तीस टक्के पेरणी झाली आहे. मंगळवारपासून पावसाने जोर धरला असून शेतकरी पेरणीच्या व टोकणीच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी ऊस लावण चालू झाली आहे. मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच होती.ंमेणी ओढ्यावरील पूल पाण्याखालीकोकरूड : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून या पाण्यामुळे मेणी ओढ्यातील पूल पाण्याखाली गेल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. येळापूर, गवळेवाडी मार्गावरील मेणी ओढ्यावर असणारा समतानगर येथील पूल पाण्याखाली गेल्याने हाप्पेवाडी, कांबळेवाडी, दीपकवाडी, समतानगर येथील वाडीचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतातील बांध फुटून माती पिकासह वाहून गेली आहे. कडेगाव तालुक्यात पावसाची रिमझिमकडेगाव : तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असले तरी, शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कडेगाव तालुक्यात कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, चिंचणी या सर्व परिसरात पावसाची रिमझिम सुरु झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाळ्यातील सुरूवातीच्या दीड महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने चिंतेत असलेले शेतकरी आता काहीसे सुखावले आहेत. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात वळीवही म्हणावा तसा झाला नव्हता. त्यानंतर मान्सूनचीही सुरूवात धीमीच झाली. तरीही धाडसाने शेतकाऱ्यांनी उशिरा पेरण्यांची कामे उरकून घेतली. पण पावसाने निराशा केली होती. आता रिमझिम झुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.चांदोलीत २०.०६ टीएमसी पाणीसाठावारणावती : चांदोली पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा गेल्या २४ तासात एक टीएमसीने वाढला आहे. धरणातील पाणीसाठा २०.०६ टीएमसी झाला आहे. शिराळा पश्चिम विभागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात येणाऱ्या प्रतिसेकंद ११ हजार ४५६ क्युसेक पाण्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात ५३ मिलिमीटर पावसासह ९४५ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. धरणाची पातळी ६१०.४० मीटर झाली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.