शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

By admin | Updated: July 6, 2016 00:38 IST

मुसळधार पाऊस : दरडींच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नजर

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांतील मार्गावरील धोके ओळखून पावसाळापूर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसातही काही अपवादवगळता कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिला किंवा अचानकपणे काही दिवस पाऊस गायब झाला तर मात्र कोकण रेल्वेच्या मार्ग सुरक्षिततेची परीक्षा ठरू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असत. त्यामुळे अनेकदा काही दिवसांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाांचे प्रचंड हाल झाले होते. दरडी कोसळल्याने रेल्वेला अपघातही झाले होते. या संकटांतून बाहेर पडण्याचा अनुभव घेणाऱ्या कोकण रेल्वेने त्यानंतरच्या काळात मार्गावर दरड कोसळणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी असलेली डोंगरांची उभी कटिंग्ज धोकादायक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर ही कटिंग्ज आणखी कमी करण्यात आली व मार्ग सुरक्षित करण्यात आला. विशेषत: पोमेंडीतील डोंगराने कोकण रेल्वेला सर्वाधिक त्रास दिला. पावसाळ्यात दरड मार्गावर कोसळण्याचे प्रकार याठिकाणी अनेकदा झाले. त्यासाठी केलेली कॉँक्रीट भिंतीची उपाययोजनाही असफल ठरली. त्या भिंतीसह दरड मार्गावर कोसळली होती. पावसाळ्यातील या संकटांमुळे कोकण रेल्वेचे अभियंतेही हतबल झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन वर्षात यामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या असून, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तेथे डोंगर मागे हटवण्यात आले आहेत. यंदा २० जूननंतरच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरी विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. तसेच अचानकपणे काही दिवसांसाठी पाऊस गायब झाला व नंतर सुरू झाला तर पाऊस नसलेल्या काळात मार्गालगतच्या पाण्याने फुगलेल्या डोंगरांना भेगा पडतील व त्यानंतर पडणाऱ्या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसात मार्गावरील सुरक्षिततेबाबत कोकण रेल्वेची खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच कोकण रेल्वेला पावसाळ्याचे तिन्ही महिने मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.दुर्घटना : मार्गालगतच्या मोठ्या वृक्षांबाबतही हवी सावधानताकोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. दुपदरीकरणासाठी डोंगर, बोगद्यांमध्ये कटाई नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची दरडींची भीती यावर्षी कमी झाली असली तरी भविष्यात दुपदरीकरणानंतर नव्याने ही समस्या निर्माण होणार आहे. कोकणातील माती भुसभुशीत असल्याने मोठा पाऊस पडल्यास ती निसटते आणि रेल्वे रुळावर येते. ही समस्या थोडीफार कमी झाली आहे. मात्र, संपलेली नाही.कोकण रेल्वेमार्गावर वीर ते करंजाडी दरम्यान चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन दिवसांपूर्वीच दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरडी कोसळणे, दगड मार्गावर येणे, याबरोबरच आता मार्गालगत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबतही निर्णय घेण्याची वेळ कोकण रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.