शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

By admin | Updated: July 6, 2016 00:38 IST

मुसळधार पाऊस : दरडींच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नजर

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांतील मार्गावरील धोके ओळखून पावसाळापूर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसातही काही अपवादवगळता कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिला किंवा अचानकपणे काही दिवस पाऊस गायब झाला तर मात्र कोकण रेल्वेच्या मार्ग सुरक्षिततेची परीक्षा ठरू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असत. त्यामुळे अनेकदा काही दिवसांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाांचे प्रचंड हाल झाले होते. दरडी कोसळल्याने रेल्वेला अपघातही झाले होते. या संकटांतून बाहेर पडण्याचा अनुभव घेणाऱ्या कोकण रेल्वेने त्यानंतरच्या काळात मार्गावर दरड कोसळणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी असलेली डोंगरांची उभी कटिंग्ज धोकादायक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर ही कटिंग्ज आणखी कमी करण्यात आली व मार्ग सुरक्षित करण्यात आला. विशेषत: पोमेंडीतील डोंगराने कोकण रेल्वेला सर्वाधिक त्रास दिला. पावसाळ्यात दरड मार्गावर कोसळण्याचे प्रकार याठिकाणी अनेकदा झाले. त्यासाठी केलेली कॉँक्रीट भिंतीची उपाययोजनाही असफल ठरली. त्या भिंतीसह दरड मार्गावर कोसळली होती. पावसाळ्यातील या संकटांमुळे कोकण रेल्वेचे अभियंतेही हतबल झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन वर्षात यामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या असून, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तेथे डोंगर मागे हटवण्यात आले आहेत. यंदा २० जूननंतरच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरी विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. तसेच अचानकपणे काही दिवसांसाठी पाऊस गायब झाला व नंतर सुरू झाला तर पाऊस नसलेल्या काळात मार्गालगतच्या पाण्याने फुगलेल्या डोंगरांना भेगा पडतील व त्यानंतर पडणाऱ्या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसात मार्गावरील सुरक्षिततेबाबत कोकण रेल्वेची खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच कोकण रेल्वेला पावसाळ्याचे तिन्ही महिने मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.दुर्घटना : मार्गालगतच्या मोठ्या वृक्षांबाबतही हवी सावधानताकोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. दुपदरीकरणासाठी डोंगर, बोगद्यांमध्ये कटाई नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची दरडींची भीती यावर्षी कमी झाली असली तरी भविष्यात दुपदरीकरणानंतर नव्याने ही समस्या निर्माण होणार आहे. कोकणातील माती भुसभुशीत असल्याने मोठा पाऊस पडल्यास ती निसटते आणि रेल्वे रुळावर येते. ही समस्या थोडीफार कमी झाली आहे. मात्र, संपलेली नाही.कोकण रेल्वेमार्गावर वीर ते करंजाडी दरम्यान चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन दिवसांपूर्वीच दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरडी कोसळणे, दगड मार्गावर येणे, याबरोबरच आता मार्गालगत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबतही निर्णय घेण्याची वेळ कोकण रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.