शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

By admin | Updated: July 6, 2016 00:38 IST

मुसळधार पाऊस : दरडींच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नजर

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांतील मार्गावरील धोके ओळखून पावसाळापूर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसातही काही अपवादवगळता कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिला किंवा अचानकपणे काही दिवस पाऊस गायब झाला तर मात्र कोकण रेल्वेच्या मार्ग सुरक्षिततेची परीक्षा ठरू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असत. त्यामुळे अनेकदा काही दिवसांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाांचे प्रचंड हाल झाले होते. दरडी कोसळल्याने रेल्वेला अपघातही झाले होते. या संकटांतून बाहेर पडण्याचा अनुभव घेणाऱ्या कोकण रेल्वेने त्यानंतरच्या काळात मार्गावर दरड कोसळणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी असलेली डोंगरांची उभी कटिंग्ज धोकादायक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर ही कटिंग्ज आणखी कमी करण्यात आली व मार्ग सुरक्षित करण्यात आला. विशेषत: पोमेंडीतील डोंगराने कोकण रेल्वेला सर्वाधिक त्रास दिला. पावसाळ्यात दरड मार्गावर कोसळण्याचे प्रकार याठिकाणी अनेकदा झाले. त्यासाठी केलेली कॉँक्रीट भिंतीची उपाययोजनाही असफल ठरली. त्या भिंतीसह दरड मार्गावर कोसळली होती. पावसाळ्यातील या संकटांमुळे कोकण रेल्वेचे अभियंतेही हतबल झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन वर्षात यामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या असून, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तेथे डोंगर मागे हटवण्यात आले आहेत. यंदा २० जूननंतरच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरी विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. तसेच अचानकपणे काही दिवसांसाठी पाऊस गायब झाला व नंतर सुरू झाला तर पाऊस नसलेल्या काळात मार्गालगतच्या पाण्याने फुगलेल्या डोंगरांना भेगा पडतील व त्यानंतर पडणाऱ्या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसात मार्गावरील सुरक्षिततेबाबत कोकण रेल्वेची खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच कोकण रेल्वेला पावसाळ्याचे तिन्ही महिने मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.दुर्घटना : मार्गालगतच्या मोठ्या वृक्षांबाबतही हवी सावधानताकोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. दुपदरीकरणासाठी डोंगर, बोगद्यांमध्ये कटाई नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची दरडींची भीती यावर्षी कमी झाली असली तरी भविष्यात दुपदरीकरणानंतर नव्याने ही समस्या निर्माण होणार आहे. कोकणातील माती भुसभुशीत असल्याने मोठा पाऊस पडल्यास ती निसटते आणि रेल्वे रुळावर येते. ही समस्या थोडीफार कमी झाली आहे. मात्र, संपलेली नाही.कोकण रेल्वेमार्गावर वीर ते करंजाडी दरम्यान चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन दिवसांपूर्वीच दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरडी कोसळणे, दगड मार्गावर येणे, याबरोबरच आता मार्गालगत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबतही निर्णय घेण्याची वेळ कोकण रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.